शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालये मूलभूत सुविधांविना

By admin | Updated: May 31, 2014 23:23 IST

खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. यातच दहावी व बारावीचे निकाल घोषित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयामध्ये गर्दी वाढत आहे.

लखमापूर : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. यातच दहावी व बारावीचे निकाल घोषित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयामध्ये गर्दी वाढत आहे. अशीच गर्दी तलाठी कार्यालयामध्ये सर्वत्र दिसत आहे. परंतु कार्यालयामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांंना तासन्तास उभे राहावे लागत आहे, तर कुठे पिण्याचे पाणी मिळत नसून उन्हाचे चटके सहन करीत गर्मीमध्ये कागदपत्रासाठी वाट पाहावी लागत आहे.शेतकर्‍यांना शेतीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येत आहे. यासाठी शेतीचा सातबारा आणि ‘अ’ प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. त्यामुळे भर उन्हात शेतकरी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. तालुक्यातील गावांची संख्या व लोकसंख्या बघून तलाठी साजाचे केंद्र काही गावामध्ये देण्यात आले आहे. यापूर्वी गावातील एखाद्याच्या घरी हे कार्यालय असयाचे. तलाठी गावात तिथेच एखाद्या छोट्या खोलीत मुक्कामाने राहायचे, ही अडचन बघून सन २000 नंतर शासनाने तलाठी कार्यालयासाठी लाखोचा निधी मंजूर केला आणि कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. कोरपना तालुक्यात तीन खोल्या बांधण्यात आल्या. समोरील खोली कार्यालयासाठी, मधात तलाठय़ांना राहण्याची खोली व आतील खोली स्वयंपाकघर म्हणून बांधण्यात आली. मात्र कार्यालयाचे र्मयादित आकारमान, वाढत्या भौतिक सुविधा यामुळे कुणीच तलाठय़ाने कार्यालयात राहणे पसंत करीत नाही. यातही कार्यालयाचे वीज भाडे तलाठय़ांनी भरावे असे निर्देश त्यांना असल्याचे समजते. त्यामुळे अनेक कार्यालयातील वीज पुरवठा बील न भरल्याने खंडित झाला आहे.कोरपना तालुक्यात नऊ तलाठी कार्यालय आहे. मात्र बहुतांश कार्यालयात वीज, पाणी व बैठक व्यवस्था नाही. त्याचबरोबर कार्यालय पसिरात घाण पसरलेली दिसते. कागदपत्रासाठी आलेले नागरिक परिसरातील झाडाचा आडोसा घेऊन प्रतिक्षा करतात.एकाचवेळी कागदपत्रांसाठी झुंबड उडत असल्याने दिवस घालवावा लागत आहे. यासाठी शासनाने ई-सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी नेटवर्कचा अभाव आणि तंत्रज्ञान माहितीच्या अभावाने शेतकरी गावतील तलाठी कार्यालयाकडे आजही धाव घेताना दिसत आहे. (वार्ताहर)