शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

तलाठी कार्यालये मूलभूत सुविधांविना

By admin | Updated: May 31, 2014 23:23 IST

खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. यातच दहावी व बारावीचे निकाल घोषित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयामध्ये गर्दी वाढत आहे.

लखमापूर : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. यातच दहावी व बारावीचे निकाल घोषित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयामध्ये गर्दी वाढत आहे. अशीच गर्दी तलाठी कार्यालयामध्ये सर्वत्र दिसत आहे. परंतु कार्यालयामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांंना तासन्तास उभे राहावे लागत आहे, तर कुठे पिण्याचे पाणी मिळत नसून उन्हाचे चटके सहन करीत गर्मीमध्ये कागदपत्रासाठी वाट पाहावी लागत आहे.शेतकर्‍यांना शेतीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येत आहे. यासाठी शेतीचा सातबारा आणि ‘अ’ प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. त्यामुळे भर उन्हात शेतकरी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. तालुक्यातील गावांची संख्या व लोकसंख्या बघून तलाठी साजाचे केंद्र काही गावामध्ये देण्यात आले आहे. यापूर्वी गावातील एखाद्याच्या घरी हे कार्यालय असयाचे. तलाठी गावात तिथेच एखाद्या छोट्या खोलीत मुक्कामाने राहायचे, ही अडचन बघून सन २000 नंतर शासनाने तलाठी कार्यालयासाठी लाखोचा निधी मंजूर केला आणि कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. कोरपना तालुक्यात तीन खोल्या बांधण्यात आल्या. समोरील खोली कार्यालयासाठी, मधात तलाठय़ांना राहण्याची खोली व आतील खोली स्वयंपाकघर म्हणून बांधण्यात आली. मात्र कार्यालयाचे र्मयादित आकारमान, वाढत्या भौतिक सुविधा यामुळे कुणीच तलाठय़ाने कार्यालयात राहणे पसंत करीत नाही. यातही कार्यालयाचे वीज भाडे तलाठय़ांनी भरावे असे निर्देश त्यांना असल्याचे समजते. त्यामुळे अनेक कार्यालयातील वीज पुरवठा बील न भरल्याने खंडित झाला आहे.कोरपना तालुक्यात नऊ तलाठी कार्यालय आहे. मात्र बहुतांश कार्यालयात वीज, पाणी व बैठक व्यवस्था नाही. त्याचबरोबर कार्यालय पसिरात घाण पसरलेली दिसते. कागदपत्रासाठी आलेले नागरिक परिसरातील झाडाचा आडोसा घेऊन प्रतिक्षा करतात.एकाचवेळी कागदपत्रांसाठी झुंबड उडत असल्याने दिवस घालवावा लागत आहे. यासाठी शासनाने ई-सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी नेटवर्कचा अभाव आणि तंत्रज्ञान माहितीच्या अभावाने शेतकरी गावतील तलाठी कार्यालयाकडे आजही धाव घेताना दिसत आहे. (वार्ताहर)