शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पाच म्हणता दहा घ्या, पण कापूस वेचणीसाठी या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्देउत्पादन नाही अन् भावही नाही : कापूस, सोयाबीन व धान उत्पादक सारेच आर्थिक संकटात, नव्या सरकारकडून अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी कापूस उत्पादनाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. शासकीय हमीभाव ५ हजार ५०० रुपये क्विंटल आहे. असे असताना खर्चाची रक्कम बघता यातून कोणताच फायदा शेतकऱ्यांना होत नसून आता तर वेचणीसाठी ५ ते ७ रुपये प्रति किलो दर द्यावे लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कापूस शेतातच पडून राहू नये म्हणून शेतकरी आता वेचणीसाठीही जादा दर देऊन मजुरांकडे साकडे घालत आहेत.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. वातावरणातील बदलामुळे कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात लाल्या रोग आला. त्यामुळे कपाशीची वाळण्याकडे वाटचाल सुरु आहे. दरम्यान, संपूर्ण कपाशी दोन-तीन वेच्यातच शेतकऱ्यांच्या घरात पोहोचली आहे. एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन होत आहे. कापूस वेचणीची मंजुरी ही ५ ते ७ रुपये प्रती किलोदराने मजुरांना द्यावी लागत आहे.एकरी चार ते पाच क्विंटल कापूस घरी येत असून जेमतेम काही हजार शेतकऱ्यांच्या हातात मिळते. शेतकऱ्यांना आधीच बियाणे, पेरणी किटकनाशक, खत, डवरणी, निंदण यासाठी पैसे खर्च करावे लागते. त्यात कापूस वेचनासाठी मजुर मिळत नाही. कसेबसे मिळावे तर त्यांना ५ ते ७ रुपये पर्यंत प्रति किलो मजुरी द्यावी लागत आहे. शेतकऱ्यांना सहा महिन्याच्या परिश्रमात त्याच्या हाती खर्चा इतपतही पैसे येत नसल्यामुळे वर्षबर कुटुंबाचे पालन-पोषण कसे करायचे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आधीच वाढलेले बँकेचे कर्ज, वेळेवरचे खर्च भागविण्यासाठी केलेला हातउसणवारी ती फेडण्यासाठी पुन्हा गावातील सावकारांचे कर्ज अशा विवंचनेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे.पावसाचा उत्पादनावर फटकायंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे संकटाचा सामना करावा लागला. अवकाळी पावसाने कपाशीची बोंडे सडल्याने उत्पादनात घट झाली आहे. तर दुसरीकडे सततच्या पावसाने कपाशीची प्रतवारी घसरल्याने बाजारभाव कमी अशी अवस्था झाली आहे. दरवर्षी साधारणत: दसऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबिन व कापूस हे नगदी पीक येतात. दिवाळी आनंदात जाते. परंतु यंदा याच काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अधिवेशनाकडे शेतकऱ्यांच्या नजराआता राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. महाविकास आघाडीची सत्ता बसली आहे. नव्या सरकारकडून शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी आशावादी झाला आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी संकटातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची ग्वाही जाहीरनाम्यात दिली होती. सोमवारपासून नागपुरात नव्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सातबारा कोरा करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा कधी होते, याकडे मोठ्या आशेने शेतकरी नजरा लावून आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी आग्रही राहिले होते. आता तर उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या अधिवेशनात ते कर्जमाफीची घोषणा करतील काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे हे अधिवेशन केवळ सहा दिवसच चालणार असे बोलले जात आहे. या सहा दिवसात शेतकऱ्यांना काही मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे.सोयाबीन उत्पादकही अडचणीतयावर्षी अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन फार मोठया प्रमाणात घटले आहे. शेतमालाची प्रतवारी घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. चार वर्षांपासून शेतकºयांनी कोरडा दुष्काळ अनुभवला. पाऊस नसल्याने शेतीत उत्पादन झाले नाही. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस चांगला पडल्याने पिकांची वाढ चांगली झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आशा होती. परंतु गत महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अति पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले असून पाण्याने सोयाबीन काळे पडले आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेसच अति पाऊस आल्याने पिकांची उगवण खुंटली. पिकांचे अतोनात नुकसान झाले. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना अंदाजे एकरी तीन ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. परंतु सोयाबीनची प्रतवारी प्रचंड घसरलेली दिसून येत आहे. सध्या बाजारात मोजके सोयाबीन सोडले, तर बहुतांश शेतकºयांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल दीड हजारापासून ते २७०० रुपये भाव मिळत आहे. शिवाय सोयाबीन ओलसर असल्याने ते वाळवायला टाकण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती