शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

‘आता जहर खाऊ नका’ गीत परिपाठात घ्या

By admin | Updated: March 19, 2015 00:52 IST

सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे.

चंद्रपूर : सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे. यामुळे आत्महत्येसाठी जहराच्या बाटलीकडे धाव घेत आहे. या शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी गावागावांतील विद्यार्थ्यांना शालेय परिपाठात ‘जहर खाऊ नका’ या गीताचा समावेश केल्यास, शेतकरी पालकांमध्ये आत्मविश्वास वाढून मुलांकडे बघून शेतकरी आत्महत्येकडे वळणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला आहे. त्यामुळे यासंदर्भातील निवेदन शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्याकडे देऊन या गीताचा परिपाठामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शेतकरी कधी ओला तर, कधी सुका दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. खरीब आणि रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील व्यक्तींचे आजार तसेच अन्य समस्यांचे निराकरण कसे करावे, या विवंचनेत आहे. यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महतेसारखा मार्ग अवलंबला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र निराश शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नाही.शेतकऱ्यांना जीवन जगण्याची नवी उभारी मिळण्याच्या दृष्टीने त्यांना धीर देवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांत कवी प्रा. ज्ञानेश वाकुलकर यांचे ‘जहर खाऊ नका’ हे गीत दैनिक परिपाठात घेतली तर चिमुकल्यांनी दिलेला धीर नैराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मृत्यूंजय मंत्रासारखा वाटेल, बळीराजाला जीवन जगण्याची एक नवीन प्रेरणा मिळेल, असही संघटनेने निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते जी.जी. धोटे, अध्यक्ष वेल्हेकर, सरचिटणीस जे.टी. पोटे, कार्याध्यक्ष रवींद्र इंंगळे, कोषाध्यक्ष पंढरी डाखरे, संतोष कुंटावार, किशोर उपरुंडवार, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगरप्रतिनिधी)