शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘आता जहर खाऊ नका’ गीत परिपाठात घ्या

By admin | Updated: March 19, 2015 00:52 IST

सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे.

चंद्रपूर : सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे. यामुळे आत्महत्येसाठी जहराच्या बाटलीकडे धाव घेत आहे. या शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी गावागावांतील विद्यार्थ्यांना शालेय परिपाठात ‘जहर खाऊ नका’ या गीताचा समावेश केल्यास, शेतकरी पालकांमध्ये आत्मविश्वास वाढून मुलांकडे बघून शेतकरी आत्महत्येकडे वळणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला आहे. त्यामुळे यासंदर्भातील निवेदन शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्याकडे देऊन या गीताचा परिपाठामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शेतकरी कधी ओला तर, कधी सुका दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. खरीब आणि रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील व्यक्तींचे आजार तसेच अन्य समस्यांचे निराकरण कसे करावे, या विवंचनेत आहे. यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महतेसारखा मार्ग अवलंबला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र निराश शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नाही.शेतकऱ्यांना जीवन जगण्याची नवी उभारी मिळण्याच्या दृष्टीने त्यांना धीर देवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांत कवी प्रा. ज्ञानेश वाकुलकर यांचे ‘जहर खाऊ नका’ हे गीत दैनिक परिपाठात घेतली तर चिमुकल्यांनी दिलेला धीर नैराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मृत्यूंजय मंत्रासारखा वाटेल, बळीराजाला जीवन जगण्याची एक नवीन प्रेरणा मिळेल, असही संघटनेने निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते जी.जी. धोटे, अध्यक्ष वेल्हेकर, सरचिटणीस जे.टी. पोटे, कार्याध्यक्ष रवींद्र इंंगळे, कोषाध्यक्ष पंढरी डाखरे, संतोष कुंटावार, किशोर उपरुंडवार, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगरप्रतिनिधी)