शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

‘आता जहर खाऊ नका’ गीत परिपाठात घ्या

By admin | Updated: March 19, 2015 00:52 IST

सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे.

चंद्रपूर : सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे. यामुळे आत्महत्येसाठी जहराच्या बाटलीकडे धाव घेत आहे. या शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी गावागावांतील विद्यार्थ्यांना शालेय परिपाठात ‘जहर खाऊ नका’ या गीताचा समावेश केल्यास, शेतकरी पालकांमध्ये आत्मविश्वास वाढून मुलांकडे बघून शेतकरी आत्महत्येकडे वळणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला आहे. त्यामुळे यासंदर्भातील निवेदन शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्याकडे देऊन या गीताचा परिपाठामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शेतकरी कधी ओला तर, कधी सुका दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. खरीब आणि रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील व्यक्तींचे आजार तसेच अन्य समस्यांचे निराकरण कसे करावे, या विवंचनेत आहे. यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महतेसारखा मार्ग अवलंबला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र निराश शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नाही.शेतकऱ्यांना जीवन जगण्याची नवी उभारी मिळण्याच्या दृष्टीने त्यांना धीर देवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांत कवी प्रा. ज्ञानेश वाकुलकर यांचे ‘जहर खाऊ नका’ हे गीत दैनिक परिपाठात घेतली तर चिमुकल्यांनी दिलेला धीर नैराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मृत्यूंजय मंत्रासारखा वाटेल, बळीराजाला जीवन जगण्याची एक नवीन प्रेरणा मिळेल, असही संघटनेने निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते जी.जी. धोटे, अध्यक्ष वेल्हेकर, सरचिटणीस जे.टी. पोटे, कार्याध्यक्ष रवींद्र इंंगळे, कोषाध्यक्ष पंढरी डाखरे, संतोष कुंटावार, किशोर उपरुंडवार, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगरप्रतिनिधी)