शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागून मनपाला रक्कम पैसे घ्या; पण पाणी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:19 IST

चंद्रपुरात सूर्याचा पारा ४५ अंशावर गेला असतानाच महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उन्हाचे चटके सोसत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक भागात पाणी पुरवठा चार-चार दिवस ठप्प राहते. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नागरिक कमालीचे संतापले आहेत.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी । पाण्यासाठी चंद्रपूरकरांचा महापालिकेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात सूर्याचा पारा ४५ अंशावर गेला असतानाच महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उन्हाचे चटके सोसत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक भागात पाणी पुरवठा चार-चार दिवस ठप्प राहते. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नागरिक कमालीचे संतापले आहेत. हा संताप आज रस्त्यावर निघाला. संतप्त झालेल्या बालाजी वॉर्ड, विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावरील लोकांना भीक मागून जमा झालेले पैसे मनपा प्रशासनाला दिले. यावेळी महिला, पुरुष मोर्चाच्या स्वरुपात महापालिकेवर धडकले. मनपा उपायुक्तांना देत ‘पैसे घ्या, पण पाणी द्या’ असा टाहो फोडला.स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूरचे स्वप्न दाखविणाऱ्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामूळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. दरम्यान, आज शनिवारी येथील बालाजी वॉर्ड, विठ्ठल मंदिर वॉर्डातील नागरिकांनी यंदा चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला. यादरम्यान महिला, पुरुषांनी रस्त्यावर भिक मागितले. भिक मागून जमा झालेले पैसे उपायुक्त गजानन बोकडे यांना देवून महापालिकेकडे पैसे नसेल तर पैसे घ्या, पण आम्हाला पाणी द्या, अशी मागणी केली.यावेळी जितेंद्र चोरडिया, अतुल रेशिमवाले, दिलीप पाठक, भारत बडवे, राहुल पाल, राजू ठाकरे, ज्योती जुमडे, करूणा जुमडे, शिल्पा बडवे, ज्योती पाठक, विशाल पाठक, किशोर जोशी, संतोष जोशी, संजू जोशी, मनोहर पाठक, ताराबाई जोशी, सागर पावडे, राजू कोहळे, गजानन कोहळे, गौरी ठाकरे, शिला पाल, वर्षा कावडकर, प्राजक्ता हस्तक, सुरेश राजूरकर व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.हा चंद्रपूरकरांवर अन्यायचसध्या चंद्रपुरात पाण्यासाठी पायपीट सुरु आहे. शहरातील अनेक प्रभागात मागील १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना तप्त उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इरई धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असूनही शहरात पाणी पुरवठा नियमित केला जात नसल्याने नागरिक संतापले आहे. नियमित पाणी कर अदा करुनही पाणी न मिळणे, हे दुर्दैव असून हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे. - किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडयावेळी किशोर जोरगेवार व नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी कामधंदे सोडून कशी भटकंती करावी लागत आहे, हे सांगितले. त्यानंतर उपायुक्त गजानन बोकडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. सहा दिवसात शहरातील पाणी प्रश्न सुटेल, असे आश्वासन यावेळी मनपा उपायुक्तांनी दिले. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन करु, असा इशारा यावेळी यंग चांदा ब्रिगेटने दिला.काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त संजय काकडे व पाणी पुरवठा कंत्राटदार यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. यावेळी ही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन मनपा आयुक्त यांनी दिले. पण आठ दिवस लोटूनही बालाजी वॉर्डातील नागरिकांची पाण्याची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी शनिवारी महापालिकेवर धडक दिली. वॉर्डातील मुख्य पाईप लाईन नवीन टाकावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.