शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

‘त्या’ कंत्राटदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:48 IST

पहिल्याच पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्ह्यातीत रस्ते बांधकामाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पहिल्याच पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या अपघातासाठी संबंधित कंत्राटदारांना दोषी ठरवून कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकून कामे नाकारावीत, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.राजुरा लक्कडकोट तसेच गडचांदूर-कोरपना मार्ग केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत बांधलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसामुळे दुरवस्था झाली. हे रस्ते वाहतुकीयोग्य नसून अपघातांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली. अपघात टाळण्याकरिता या रस्त्यांची सुधारणा करण्याच्या सूचना ना. अहीर यांनी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्याला केल्या. राजुरा-लक्कडकोट मार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल तक्रारी आल्या होत्या. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले हा प्रकार गंभीर असल्याचेही असेही ते म्हणाले. गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या बांधकामाची चौैकशी करून संबंधित कंत्राटदारांना कारवाई करावी. राजुरा व बाबुपेठ येथील रेल्वे ओवरब्रिज कामाचाही या बैठक आढावा घेतला. या कामाची गती वाढविण्याच्या सुचनाही बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिल्या. यावेळी महापौर अंजली घाटेकर, विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुले सराफ आदी उपस्थित होते.आदिवासी वसतिगृह हस्तांतरित होणारराजुरा व चंदनखेडा येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने हे दोन्ही वसतिगृह संबंधित विभागाकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करावी. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा उपयोग घेता येईल. केवळ उद्घाटनाचे औचित्य पुढे करून विद्यार्थी प्रवेश प्रलंबित ठेवू नये, अशा सुचनाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. राजुरा येथील रूग्णालयाच्या बांधकामासाठी पाच कोटींचे वाढीव अंदाजपत्रक अनावश्यक असल्याचे स्पष्ट करून बांधकाम पूर्णावस्थेत आल्याने उर्वरीत बांधकाम अल्प खर्चात करावे. ही इमारत आरोग्य विभागाला अविलंब हस्तांतरीत करण्यात येईल, अशी ग्वाही ना. अहीर यांनी दिली.