शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

धानाच्या पाण्यासाठी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

By admin | Updated: October 17, 2015 01:32 IST

करारनामा करुनही आसोला मेंढा तलावातील पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी नकारात्मक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ...

अखेर अधिकारी नमले : शेतीला पाणी देण्याचे लेखी आश्वासन मिळालेचंद्रपूर: करारनामा करुनही आसोला मेंढा तलावातील पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी नकारात्मक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी शेतकऱ्यांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून वठणीवर आणले. या आंदोलनाचा धसका घेऊन अखेर सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी नरमाईचे धोरण घेतले आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले.जिल्ह्यातील धान पिकांसह अन्य पिकांचीही स्थिती पावसाअभावी भीषणावह झाली आहे. शेतातील धानाचे उभे पिक पाण्याअभावी सुकायला लागल्याने १२ आॅक्टोबरला शेतकऱ्यांनी नांदगाव (ता. सावली) सिंचाई शाखा अभियंत्यांना भेटून शेतीसाठी या तलावाचे पाणी सोडण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या शेतासाठी पाणी सोडण्याचा करारनामा या विभागाचा असल्याने तांत्रिक अडचण कसलीही नव्हती. मात्र शेतकऱ्यांनी विनंती करुनही अधिकारी मात्र ऐकायला तयार नव्हते. दिघोरी आणि गोवर्धन मायनरसाठी १६ आॅक्टोबर च्या दुपारी १ वाजेपर्यंत पाणी साडव्याचे लेखी आश्वासन १२ आॅक्टोबरला अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र ही वेळ उलटूनही अधिकारी दाद देत नव्हते. अखेर आज (शुक्रवारी) दुपारी १२ वाजता आसोला मेंढा तलावाखालील दिघोरी व गोवर्धन मायनर खालील शेतकऱ्यांनी फूटाणा क्रांसिंग ते सिंचाई कार्यालय नांदगावपर्यंत जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांच्या नेतृत्वात सरकारच्या निषेधात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. शेतीलापाणी मिळालेच पाहिजे पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी दणाणून सोडला. अखेर मूल तहसीलदार उपविभागीय अभियंता सिंचाई उपविभाग सावली शाखाधिकारी सिंचाई शाखा नांदगाव आणि मूल ठाणेदारांनीपाचारण केले.शिष्टमंडळात विनोद अहिरकर, कवडू कुदावार, दिलीप म्यॉडावार, इंद्रजीत वनकर, रवी मरपल्लीवार, प्रशांत झाडे, दादाजी व्याहाडकर, प्रमोद ओदेलवार, नरेंद्र उमक, उमेश इनमवार, आशिष अहिरकर, सुधाकर बांबोळे, महेश अल्लीवार, मनोज अहिरकर आदी सहभागी होते. अखेर सिंचाई विभागाच्या शाखा अभियंत्यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यावरच सर्वांचे समाधान झाले. (जिल्हा प्रतिनिधी)