शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियान केवळ देखावा

By admin | Updated: December 18, 2014 22:52 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, शाळा संस्था, स्वराज्य संस्था आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र महिना लोटूनही

खांबाडा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, शाळा संस्था, स्वराज्य संस्था आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र महिना लोटूनही परिसरातील अनेक कार्यालये व गावातील रस्त्यावरची घाण स्वच्छ झाली नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान खांबाडा परिसरात केवळ देखावा ठरत असल्याचे बोलले जात आहे. महात्मा गांधी जयंती दिनापासून शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयासह शहरात व ग्रामीण भागात हे अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी आपापल्या भागात स्वच्छता अभियान राबविली. मात्र ही मोहीम केवळ एक दिवसापुरतीच मर्यादित राहिली. हातात झाडू घेऊन छायाचित्र काढून केवळ देखावा निर्माण करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गावामध्ये पुन्हा कचरा व घाण दिसून येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांनी स्वत: परिश्रम घेऊन स्वच्छतेचा उपदेश केला. त्यामुळे त्यांच्या सांगण्याचा प्रभाव पडून त्याचे विचार नागरिकांनी आत्मसात केले होते. शासकीय कार्यालयातील शौचालयाची अवस्था बघूनच शौचालयाला न गेलेले बरे, असा विचार येतो.गुटखा, तंबाखू, सिगारेट, बिडी यामुळे आणखी घाणीचे साम्राज्य वाढत आहे. शासकीय परिसर, आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्रसुतिगूह, पशुवैद्यकीय दवाखाने तसेच तलाठी कार्यालयाचे परिरसर हे बघण्यासारखे आहेत. शासन स्वच्छतेसाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे.परंतु शासकीय यंत्रणा व नागरिकांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. अनेक गावात अद्याप रस्त्यावरच शौचविधी आटोपला जातो. जोपर्यंत पदाधिकारी अधिकारी व जनता आपली मानसिकता बदलविणार नाही, तोपर्यंत गावे स्वच्छ होऊ शकणार नाही.त्यामुळे स्वच्छ भारत अभियान केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)