शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

पाईप लाईनचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:35 IST

चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जुनी, खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन बदलविण्याची मागणी वारंवार करण्यात आली. चक्क जीवन प्राधिकरणनेही ही पाईप लाईन बदलविण्याचा अनेक वर्षांपूर्वी अहवाल दिला होता.

ठळक मुद्देखिळखिळी पाईपलाईन धोकादायक : अनेक ठिकाणी लिकेज, दूषित पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जुनी, खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन बदलविण्याची मागणी वारंवार करण्यात आली. चक्क जीवन प्राधिकरणनेही ही पाईप लाईन बदलविण्याचा अनेक वर्षांपूर्वी अहवाल दिला होता. मात्र चंद्रपूरकरांना खिळखिळ्या पाईप लाईनच्या स्वरुपात लागलेले ग्रहण अद्याप कायमच आहे. मनपा झाल्यानंतर अनेकदा निधी येत गेला, खर्चही होत गेला. अमृत योजनेचेही काम सुरू आहे. मात्र अद्यापही चंद्रपूरकरांना जीर्ण पाईपलाईनमधून येणारे पाणीच प्यावे लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणच्या लिकेजमधून दूषित पाणी पुरवठाही होत आहे.३० ते ३५ वर्षांपूर्वी नगरपालिका अस्तित्वात असताना शहरात पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली. साधारणत: या पाईप लाईनची वयोमर्यादा १७ वर्ष असते. १७ वर्ष झाले की ती पाईप लाईन कालबाह्य झाली, असे समजण्यात येते. मात्र चंद्रपुरात अद्याप याच पाईप लाईनमधून पाणी पुरवठा होत आहे. ही पाईप लाईन ३५ ते ४० वर्ष जुनी झाली असल्याने खिळखिळी झाली आहे. अनेक ठिकाणी पाहिजे तसा पाण्याचा फोर्स येत नाही. याशिवाय ही पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेज होऊन नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतो. अनेक ठिकाणी पाण्याची गळतीही सुरू असते. त्यामुळे ही पाईप लाईन बदलवून नवी पाईप लाईन टाकण्यात यावी, अशी नागरिकांनी वारंवार मागणी केली. मात्र या मागणीकडे गांभीर्याने बघण्यात आले नाही. दरम्यान, मध्यंतरी जीवन प्राधिकरण विभागानेही ही पाईप लाईन कालबाह्य झाली असल्याने बदलविण्याबाबतचा अहवाल तत्कालीन नगरपालिकेला दिला होता. नगरपालिका असताना ही पाईपलाईन बदलविण्याबाबत विचारमंथनही झाले. मात्र माशी कुठे शिंकली, हे कळले नाही. चंद्रपूर शहराच्या पंचशताब्दी वर्षानिििमत्त चंद्रपूरच्या विकासासाठी राज्य शासनाने २५० कोटींचा निधी देऊ केला होता. यातील पहिला हप्ता म्हणून २५ कोटी रुपये मनपाला प्राप्तही झाले होते. या निधीतून जुनी पाईप लाईन बदलविण्याचाही विचार मनपाने केला होता. नवीन ठिकाणी पाईप लाईन टाकण्यासाठी दोन कोटी व जुन्या पाईप लाईन बदलविण्यासाठी सहा कोटींची तरतूद करणारा प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्तावदेखील मध्येच गुंडाळला.मनपा झाली; तरीही पाईपलाईन तीचचंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. मनपाचे उत्पन्नही वाढले आहे. वरवरचे शहर चकाचक करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र जमिनीच्या खालील पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन बदलविण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे ही समस्या सुटू शकली नाही.सिव्हरेज योजनेमुळे पाईपलाईन फुटण्याची भीतीसिव्हरेज योजनेचे बंद पडलेले काम पुन्हा महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी काही भागातील रस्ते पुन्हा फोडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच रामनगर मार्गावर सिव्हरेजच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. या खोदकामामुळे आधीच जीर्ण झालेली पाणी पुरवठ्याची पाईप लाईन फुटण्याची शक्यता अधिक आहे.लिकेजमुळे पाणी दूषितपाणी वितरण व्यवस्थेतील पाईपलाईन कालबाह्य व खिळखिळी झाली आहे. या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेजेस आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. रस्त्यावर चिखल, नाल्या तुंबलेल्या आहेत. हे चिखलयुक्त पाणी लिकेजमधून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये जाऊन अनेक भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. जवळजवळ प्रत्येक नळाला आधी अर्धा तास लालसर दूषित पाणी येत असल्याचे दिसते.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण