शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

४० पट कर आकारण्याच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:45 IST

शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या ४० पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेश : व्यापारी शिष्टमंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या ४० पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या या बैठकीत शहरातील व्यापारी शिष्टमंडळ सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असणाºया जुन्या मालमत्तांना अचानक मोठ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात आली आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. सोमवारी शिष्टमंडळाने भेट घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यामध्ये तोडगा काढावा, अशी मागणी केली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महपौर अंजली घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी अभय जोशी, जिल्हा खनिकर्म अधिकारी कामडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.यावेळी व्यापारी व अधिकारी या दोघांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाºयांना आपल्या नियमित वापराच्या मालमत्तेसाठी इतक्या मोठया प्रमाणात कर आकारणे योग्य नसून तूर्तास हा कर वसुलीस स्थगिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या निर्णयाबद्दल व्यापाºयांनी समाधान व्यक्त केले असून शासनाने योग्य पध्दतीने कर आकारणी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जलशुद्धीकरणासाठी पाच कोटीचंद्रपूर शहरातील उन्हाळयातील पाण्याचे संभाव्य दूर्भिक्ष लक्षात घेता तातडीची पाणी पुरवठा लाईन टाकण्यासाठी व शहरात विविध ठिकाणी हातपंप, कुपनलिका, विहिरीवर पंप बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महापौर अंजली घोटेकर यांनी केली होती. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी आपल्या तातडीच्या दौºयात या निधीला मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत त्यांनी अधिकाºयांशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेतला. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी कामडे, नगरसेवक रवी आसवानी, राजू गोलीवार उपस्थित होते. यावर्षी शहर व जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी शहरातील पाणी पुरवठा नियमित स्वरुपात व्हावा. त्यामध्ये अनावश्यक कपात करु नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे मार्च महिन्यातही महानगरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. तथापि, आगामी काळात शहरामध्ये पाण्याची मागणी वाढणार असून त्यासाठी माडा जलशुध्दीकरण केंद्र ते रामनगर जलशुध्दीकरण केंद्र असे पाणी पुरवठयाचे काम करायचे आहेत. यासाठी तीन कोटी आठ लाख रुपये तर आवश्यकतेनुसार शहरातील विविध ठिकाणी हात पंप, कुपनलिका, विहीरवर पंप बसविण्याचे काम महानगरपालिकेने प्रस्तावित केले आहे. या कामासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे.