शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सर्व्हेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे. पिकासाठी पाऊस अत्यावश्यक आहे. परंतु संततधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी । परतीच्या पावसाने खरीप पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिकांची नासाडी होत आहे. ऑक्टोबर महिना संपत असतानाही पावसाचा परतीचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने मागील दोन महिन्यापासून विश्रांती घेतली नसल्याने पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून संततधार पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.सध्या शेतामध्ये कापुस, तूर, सोयाबीन आदी पिक फळधारणेवर आहे.काही भागात पिकांची चांगली फळधारणा होत आहे. मात्र पावसामुळे हाती येणारे पीक गमवावे लागेल, अशी भिती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे.पिकासाठी पाऊस अत्यावश्यक आहे. परंतु संततधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाचा सामना करावा लागत आहे.शेतात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या ना त्या कारणामुळे चिंतेत असलेल्या शेतकºयांकडे शासनाने लक्ष देवून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.सध्या शेतामध्ये सोयाबीनची कापनी करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे ते पिक ओले होत असून मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीसाठी हातात पैसे येईल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा यावर्षीही त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी सध्या तरी अंधारात असून मदत करणे गरजेचे आहे.निसर्गाची अवकृपा, शासनाचेही दुर्लक्षया ना त्या कारणामुळे सतत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गानेही यावर्षी अवकृपा केली आहे. यावर्षी प्रथम पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर येणाऱ्या सततच्या पावसामुळे आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती