शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सर्व्हेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे. पिकासाठी पाऊस अत्यावश्यक आहे. परंतु संततधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी । परतीच्या पावसाने खरीप पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिकांची नासाडी होत आहे. ऑक्टोबर महिना संपत असतानाही पावसाचा परतीचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने मागील दोन महिन्यापासून विश्रांती घेतली नसल्याने पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून संततधार पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.सध्या शेतामध्ये कापुस, तूर, सोयाबीन आदी पिक फळधारणेवर आहे.काही भागात पिकांची चांगली फळधारणा होत आहे. मात्र पावसामुळे हाती येणारे पीक गमवावे लागेल, अशी भिती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे.पिकासाठी पाऊस अत्यावश्यक आहे. परंतु संततधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाचा सामना करावा लागत आहे.शेतात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या ना त्या कारणामुळे चिंतेत असलेल्या शेतकºयांकडे शासनाने लक्ष देवून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.सध्या शेतामध्ये सोयाबीनची कापनी करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे ते पिक ओले होत असून मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीसाठी हातात पैसे येईल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा यावर्षीही त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी सध्या तरी अंधारात असून मदत करणे गरजेचे आहे.निसर्गाची अवकृपा, शासनाचेही दुर्लक्षया ना त्या कारणामुळे सतत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गानेही यावर्षी अवकृपा केली आहे. यावर्षी प्रथम पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर येणाऱ्या सततच्या पावसामुळे आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती