शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सर्व्हेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे. पिकासाठी पाऊस अत्यावश्यक आहे. परंतु संततधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी । परतीच्या पावसाने खरीप पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिकांची नासाडी होत आहे. ऑक्टोबर महिना संपत असतानाही पावसाचा परतीचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने मागील दोन महिन्यापासून विश्रांती घेतली नसल्याने पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून संततधार पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.सध्या शेतामध्ये कापुस, तूर, सोयाबीन आदी पिक फळधारणेवर आहे.काही भागात पिकांची चांगली फळधारणा होत आहे. मात्र पावसामुळे हाती येणारे पीक गमवावे लागेल, अशी भिती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना निंदणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. २०० रुपयांपर्यंत निंदनाची प्रत्येकी मजुरी देऊन निंदन केले. आता पुन्हा संततधार पावसामुळे जुनीच अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाने पैसा घेण्याची वेळ आली आहे.पिकासाठी पाऊस अत्यावश्यक आहे. परंतु संततधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाचा सामना करावा लागत आहे.शेतात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या ना त्या कारणामुळे चिंतेत असलेल्या शेतकºयांकडे शासनाने लक्ष देवून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.सध्या शेतामध्ये सोयाबीनची कापनी करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे ते पिक ओले होत असून मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीसाठी हातात पैसे येईल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा यावर्षीही त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी सध्या तरी अंधारात असून मदत करणे गरजेचे आहे.निसर्गाची अवकृपा, शासनाचेही दुर्लक्षया ना त्या कारणामुळे सतत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गानेही यावर्षी अवकृपा केली आहे. यावर्षी प्रथम पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर येणाऱ्या सततच्या पावसामुळे आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती