शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मागणीपत्रात अडला टीएचआरचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST

शहरी प्रकल्पातील बचतगट महिलांसमोर संकट सकाळ वृत्तसेवा चंद्रपूर : अंगणवाड्यांतील मुलांना पूरक पोषण आहार पुरवठा करण्यात येतो. हे काम ...

शहरी प्रकल्पातील बचतगट महिलांसमोर संकट सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : अंगणवाड्यांतील मुलांना पूरक पोषण आहार पुरवठा करण्यात येतो. हे काम बचतगटांकडे आहे. ग्रामीण भागात पूरक पोषण आहार पुरवठा सुरू आहे. मात्र, शहरी प्रकल्पातील गटांना अद्याप मागणीपत्र मिळाले नाही. त्यामुळे टीएचआर पुरवठा सध्या बंद आहे. आयुक्तालयाने मागणी पत्र देऊन टीएचआर पुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला बचतगट महासंघाने केली आहे.

पूरक पोषण आहार पुरवठा आणि गरम ताजा पुरवठा टेंडर सप्टेंबर २०१९ आणि फेरनिविदा २०२० मध्ये काढण्यात आली. यात निवड झालेल्या बचतगटांना नियोजित समितीमार्फत उत्पादन केंद्रांना भेट देऊन कार्यक्षम गटांना ऑक्टोबर महिन्यात टीएचआर पुरवठा करण्याबाबत पत्र देण्यात आले. त्याअनुशंगाने ग्रामीण प्रकल्पात टीएचआर पुरवठा सुरू आहे. मात्र, शहरी प्रकल्पातील गटांना अद्याप मागणीपत्र मिळाले नाही. टीएचआर उत्पादन करणाऱ्या मशीन, साहित्य, गोदामाचा किराया, वीजबिल, पाण्याच्या बिलाचा भार गटावर पडत आहे. या कामासाठी बचतगटाने मशिनी घेतल्या. मात्र, आता काम बंद असल्याने त्या धूळखात पडल्या आहेत. मागणीपत्र देण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याचा काहीच ङ्कायदा झाला नाही. त्यामुळे आता बचतगटाच्या महिला आंदोलनाच्या तयारीत आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सुनीता लांडे, वैशाली दिघोरे, सुशीला मत्ते यांचा समावेश होता.