शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

उन्हाची काहिली वाढली

By admin | Updated: March 27, 2016 00:32 IST

चंद्रपूर जिल्हा ‘हाट’ जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा तर चांगलाच प्रसिध्द झाला आहे.

दुपारी वर्दळ कमी : पारा ४० अंशापार, अडगळीतले कुलर निघाले बाहेरचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा ‘हाट’ जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा तर चांगलाच प्रसिध्द झाला आहे. होळी संपल्यानंतर सुर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्य संकेत आहे. मात्र चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातच मार्चच्या पंधरवाड्यापासूनच सुर्याचा पारा चढू लागला आहे. आता तर मार्च महिन्यातच उन्हाचा पारा ४० अंशापार गेला आहे. उन्हाची काहिली चंद्रपूरकरांना आतापासूनच असह्य होऊ लागली आहे.या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सिंचन प्रकल्पातही पाणी नाही. ग्रामीण भागातील नदी-नाले, बोड्या, तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आता उन्हाळ्यालाही चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ४०.२ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल शुक्रवारीदेखील ४०.१ अंश सेल्सीयस तापमान होते. मार्च महिन्यातच सुर्याचा पारा ४० अंशापार गेल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता चंद्रपूरकरांना लागली आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग सोडले तर इतर मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहे. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक नानाविध उपाय करताना दिसून येत आहे. तोंडावर रुमाल, डोक्यावर टोपी घालणे नागरिकांनी सुरू केले आहे.त्यामुळे टोप्यांची दुकाने, गागल्सची दुकाने फुटपाथवर लागली आहे. याशिवाय चंद्रपूर शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फिरत्या रसवंत्या दिसू लागल्या आहेत. या रसवंत्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. (शहर प्रतिनिधी)पाण्याची पातळी खालावलीदुसरीकडे उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव तर आटण्याच्या मार्गावर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील जलस्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. कोरपना, जिवती तालुक्यातील अनेक गावात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत आहे. माणिकगड पहाडावरील अनेक गुड्यातील लोक पाण्यासाठी एक-दोन किलोमीटरची पायपीट करताना दिसत आहेत.मडक्यांची मागणी वाढलीउन्हाची काहिली वाढली की थंड पाणी मोठा आधार वाटतो. त्यामुळे मडक्यांची मागणी वाढते. आताही येथील कुंभार चाळीत नागरिकांची माठ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. अनेक छोटे व्यावसायिक, गोरगरीब नागरिक फ्रिज घेण्याच्या भानगडीत न पडता माठातच पाणी ठेवतात. त्यामुळे सध्या माठांच्या किमतीही वधारल्या आहे. पूर्वी ४०-५० रुपयात मिळणाऱ्या माठाची किंमत आता शंभर-दीडशे रुपयांवर गेली आहे.होळीच्या आदल्यादिवशी सर्वाधिक तापमानहोळीच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ मार्चला चंद्रपुरात ४३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. त्यानंतर सुर्याचा पारा कमी झाला. तरीही तो ४० अंशापार आहेच.