शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातील विवाह सोहळे दिवाळीत उरकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचा वाढतच असल्याने विवाहोत्सुकांच्या आशेवर पाणी फेरतच राहिले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचे विघ्न : धुमधडाक्यातील सोहळ्यांना मुरड, नागभीड तालुक्यात विवाहाकरिता ८५ अर्ज

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी यंदा विवाह सोहळ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला होता. नागरिकांच्या मागणीवरून ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली. मात्र, धुमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांनी उन्हाळ्यात जुळलेले विवाह पुढे ढकलून दिवाळीत करण्याचा बेत आखला आहे. दरवर्षी तालुक्यात हजारो विवाह पार पडायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे आतापर्यंत विवाह परवानगीसाठी केवळ ८५ अर्ज आले. त्यापैकी ७५ विवाह पार पडले आहेत.शहरी भागात वर्षभर केव्हाही विवाह करण्याची पंरपरा आहे. शहरातील बहुतांश विवाह हे तिथीनुसार नाही तर मंगल कार्यालयाच्या उपलब्ध तारखेनुसार होत असतात. ग्रामीण भागाची संस्कृती वेगळी असल्याने मार्च, एप्रिल व मे महिन्यातच होत असतात. या काळात शेतीची कामे नसतात. जून महिना सुरू झाल्यानंतर डिसेंबर^^-जानेवारी महिन्यापर्यंत शेतीच्या कामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात विवाह सोहळे उन्हाळ्यातच उरकून घेण्याला प्राधान्य दिले जाते. यावर्षीही याच तयारीने अनेकांनी लग्न जुळवून घेतले. अनेकांचे जुळवून घेणे सुरू असतानाच कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचा वाढतच असल्याने विवाहोत्सुकांच्या आशेवर पाणी फेरतच राहिले. अशा परिस्थितीत किती दिवस वाट पाहायचे म्हणून काही जणांनी शासनाच्या नियमांना अधिन राहून विवाह पाडू, अशी हमी देणारे अर्ज सादर करण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत विवाहाची परवानगी मागणारे ८५ अर्ज तहसील कार्यालयात प्राप्त झाले. यातील ७५ अर्जदारांच्या विवाहांना परवानगी देण्यात आली असून १० अर्जदारांची परवानगी शिल्लक आहे.परवानगी अत्यावश्यकनागभीड तालुक्यात मार्च ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजारो विवाह पार पडत असतात. दोन हजार लोकसंख्येच्या गावातही ३० ते ४० विवाह होतात. मात्र यावर्षी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दीला मनाई करण्यात आली. तहसील कार्यालयात विहित नुमन्यात अर्ज व कागदपत्रे सादर केल्यास तहसीलदाराकडून विवाहाला परवानगी दिली जाते.आतापर्यंत ७५ विवाहासाठी परवानगी देण्यात आली आहे. १० अर्ज शिल्लक आहेत. विवाह सोहळ्यात गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- मनोहर चव्हाण,तहसीलदार नागभीड. 

टॅग्स :marriageलग्न