शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

उन्हाळ्यातील विवाह सोहळे दिवाळीत उरकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचा वाढतच असल्याने विवाहोत्सुकांच्या आशेवर पाणी फेरतच राहिले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचे विघ्न : धुमधडाक्यातील सोहळ्यांना मुरड, नागभीड तालुक्यात विवाहाकरिता ८५ अर्ज

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी यंदा विवाह सोहळ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला होता. नागरिकांच्या मागणीवरून ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली. मात्र, धुमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांनी उन्हाळ्यात जुळलेले विवाह पुढे ढकलून दिवाळीत करण्याचा बेत आखला आहे. दरवर्षी तालुक्यात हजारो विवाह पार पडायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे आतापर्यंत विवाह परवानगीसाठी केवळ ८५ अर्ज आले. त्यापैकी ७५ विवाह पार पडले आहेत.शहरी भागात वर्षभर केव्हाही विवाह करण्याची पंरपरा आहे. शहरातील बहुतांश विवाह हे तिथीनुसार नाही तर मंगल कार्यालयाच्या उपलब्ध तारखेनुसार होत असतात. ग्रामीण भागाची संस्कृती वेगळी असल्याने मार्च, एप्रिल व मे महिन्यातच होत असतात. या काळात शेतीची कामे नसतात. जून महिना सुरू झाल्यानंतर डिसेंबर^^-जानेवारी महिन्यापर्यंत शेतीच्या कामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात विवाह सोहळे उन्हाळ्यातच उरकून घेण्याला प्राधान्य दिले जाते. यावर्षीही याच तयारीने अनेकांनी लग्न जुळवून घेतले. अनेकांचे जुळवून घेणे सुरू असतानाच कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचा वाढतच असल्याने विवाहोत्सुकांच्या आशेवर पाणी फेरतच राहिले. अशा परिस्थितीत किती दिवस वाट पाहायचे म्हणून काही जणांनी शासनाच्या नियमांना अधिन राहून विवाह पाडू, अशी हमी देणारे अर्ज सादर करण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत विवाहाची परवानगी मागणारे ८५ अर्ज तहसील कार्यालयात प्राप्त झाले. यातील ७५ अर्जदारांच्या विवाहांना परवानगी देण्यात आली असून १० अर्जदारांची परवानगी शिल्लक आहे.परवानगी अत्यावश्यकनागभीड तालुक्यात मार्च ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजारो विवाह पार पडत असतात. दोन हजार लोकसंख्येच्या गावातही ३० ते ४० विवाह होतात. मात्र यावर्षी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दीला मनाई करण्यात आली. तहसील कार्यालयात विहित नुमन्यात अर्ज व कागदपत्रे सादर केल्यास तहसीलदाराकडून विवाहाला परवानगी दिली जाते.आतापर्यंत ७५ विवाहासाठी परवानगी देण्यात आली आहे. १० अर्ज शिल्लक आहेत. विवाह सोहळ्यात गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- मनोहर चव्हाण,तहसीलदार नागभीड. 

टॅग्स :marriageलग्न