शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अतिवृष्टीत घर कोसळलेल्या सुमनबाईचा घरकुलासाठी संघर्ष

By admin | Updated: November 15, 2015 02:26 IST

पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवाडा खुर्द येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे ..

वरिष्ठांनी दखल घ्यावी : वृद्धपणात झिजवीत आहेत कार्यालयाचे उंबरठेपोंभुर्णा : पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवाडा खुर्द येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे वार्ड क्र. २ मध्ये वास्तव्यास असलेली अल्पभूधारक विधवा महिला सुमन गद्देकार हिचे संपूर्ण घर कोसळले. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या सुमनला शेजाऱ्यांनी आश्रय दिला. शासनाने दिलेल्या तुटपुंज्या मदतीने शेजाऱ्यांनी हातभार लावून छोट्याशा झोपडीची व्यवस्था करून दिली. त्या झोपडीत सुमनबाई आपले वास्तव करीत असून गेल्या दोन वर्षापासून ती घरकुलाच्या संघर्षात कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.सन २०१२-१३ मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने विटा मातीचे असलेले एक लाख रुपये खर्च करून बांधलेले सुमनबाईचे संपुर्ण घर कोसळले. सुमनबाईचे पती सिताराम गद्देकार हे सात वर्षापूर्वीच वारले. पतीच्या निधनानंतर ती एकटीच घरात वास्तव्यास राहत होती. तिला अपत्य नाही. तिची परिस्थिती फारच हलाखीची असून दोन वेळ पोटाची खडगी भरणेही तिला कठीण जात आहे. मोलमजुरी करून आपले कसेबसे जीवन जगत असताना तिच्यावर निसर्गाची अवकृपा झाली आणि पावसाने सुमनचे अख्खे घर पडले. तिच्यावर बेघर होण्याची पाळी आली. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या पुरुषोत्तम घुघुस्कार यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिला.या घटनेनंतर शासनाकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सुमनने ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय गाठले आणि आपली आपबिती सांगितली. घर कोसळल्याने तिचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असले तरी तहसील कार्यालयाकडून मात्र तिला १ हजार ९०० रुपयांची तुटपुंजी मदत मिळाली. सुमनला अपत्य नसल्याने व अल्प शेती असल्याने वयाच्या ६७ व्या वर्षी मोलमजुरी करून तिला जीवन जगावे लागत आहे.दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या सुमनला एक हजार ९०० रुपयांत काय होणार असा प्रश्न पडला. त्यामुळे येथील जिल्हा परिषद सदस्य संगिता घोगडे व सामाजिक कार्यकर्ते निळकंठ नैताम यांनी तत्कालीन तहसीलदार राजेश सरवदे यांची भेट घेऊन सदर महिलेची आपबिती सांगितली. तेव्हा सरवदे यांनी प्रत्यक्षात सुमनबाईच्या पडक्या घराला भेट देऊन शासनाकडून १५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे या महिलेला आपण घरकुल देऊ, असे आश्वासनसुद्धा दिले होते. परंतु त्यांची मात्र पोंभुर्णा येथून बदली झाल्याने तिच्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले. शासनाकडून मिळालेल्या १५ हजार रुपयांतून शेजारच्या व्यक्तींनी छतासाठी टिनांची व काही विटांची व्यवस्था करून दिली. एका झोपडीची व्यवस्था करून देण्यात आली आणि त्या झोपडीत ती वास्तव्य करीत आहे. आज ती म्हातारी झाली असल्याने तिला फिरणेही अवघड झाले आहे. मरणोत्तर काळामध्ये तरी घरकुल मिळणार काय, असा प्रश्न तिच्या समोर उभा ठाकला आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुमनबाईला घरकुल द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)