शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

शालूचा मोबाईल उलगडणार आत्महत्येचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:13 IST

घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पोलीस सांगत आहे.

ठळक मुद्देकुटुंबीयांचे बयाण नोंदविले : पोलिसांकडून तपासाला गती, घुग्घुसवासीयांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पोलीस सांगत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शालू शिंदे यांच्या मोबाईलच्या माध्यमातून पोलीस या प्रकरणातील रहस्य उलगडणार असल्याचे बोलले जात आहे.शालू शिंदे या आपल्या परिवारात आनंदी जीवन जगत होत्या, अशी माहिती चर्चेतून पुढे येत आहे. अशातच त्यांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याने घुग्घुसमध्येच नव्हे, तर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आनंदी जीवन जगत असताना त्यांना आत्महत्या करण्याची गरज का भासली, असा प्रश्न जनतेला पडला आहे.त्यांच्या आत्महत्येमागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असल्याचा सूरही घुग्घुसमध्ये ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी शालू शिंदे यांचे पती विवेक शिंदे यांनी शालू यांचा मोबाईल घुग्घुसचे ठाणेदार आमले यांना चौकशीसाठी ताब्यात दिला. तसेच पोलिसांनी घरातील मंडळींचेही बयाण नोंदवून घेतले आहे. मात्र याचा उलगडा करण्यास पोलिसांनी नकार दिला. यामुळे या घटनेचे रहस्य आणखीच वाढले आहे.चर्चेच्या आधारे शालू यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवरून कोणाशीतरी संभाषण केले होते. यानंतर काहीवेळातच आत्महत्या झाल्याचेही बोलले जात आहे. या अनुषंगाने शालू यांच्या मोबाईलचे एकूणच कॉल डिटेल्स तपासात घेतले तर आत्महत्येच्या रहस्यावरून पडदा हटण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.एक पंचायत समिती सदस्य एकाएकी आत्महत्या करते. यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असावे, असा सूर असल्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून नेमके सत्य पुढे आणण्याचे आव्हान घुग्घुस पोलिसांपुढे आहे.