शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान रेंगाळले

By admin | Updated: May 13, 2015 00:08 IST

विशेष घटक योजनेत लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना शेतात विहीरी तयार करण्यासाठी बाध्य केले.

वरोरा: विशेष घटक योजनेत लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना शेतात विहीरी तयार करण्यासाठी बाध्य केले. विहिरीचे काम तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र काम पूर्ण होवूनही लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहे.महाराष्ट्र शासनाच्या निकषाप्रमाणे विशेष घटक योजनेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये मोडत असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली जाते. यामध्ये लाभार्थ्यांना शेती असणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करीत कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती कार्यालयाला सादर केल्यानंतर अधिकारी शेताची पहाणी करुन लाभार्थ्यांना विहीरीचे काम करावयास सांगितले. लाभार्थ्यांनी आप्तेष्टांकडून उसणवारीने पैसे घेऊन प्रसंगी उधारीवर साहित्य मागावून विहिरीचे काम पूर्ण केले. त्या कामाची पहाणी अहवाल संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुपूर्द केला. परंतु मागील तीन महिन्यापासून आजतागायत लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. लाभार्थी दररोज पंचायत समितीच्या येरझरा करीत आहेत. परंतु त्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही. ते केव्हा मिळणार, याबाबत कुणीही मार्गदर्शन करीत नसल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहे. या योजनेतील पदभार कुणाकडेच नाही. विशेष घटक योजनेला पदभार असलेले अधिकारी मागील तीन महिन्यापूर्वीच स्थालांतरित झाले. त्यांचा इतर पदभार कार्यरत अधिकाऱ्यांना देण्यात आला. परंतु विशेष घटक योजनेचा कार्यभार कुणाकडेही देण्यात आला नाही. लाभार्थ्यांनी जेव्हा पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची भेट घेतली तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यामुळे तात्काळ एका विस्तार अधिकाऱ्याकडे विशेष घटक योजनेचा पदभार देवून सारवासारव केल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)