शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गुंठेवारीचा अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:07 IST

गुंठेवारीत चंद्रपूर शहरातील तब्बल अडीच हजारांवर प्रकरणे प्राप्त झाली आहेत. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे सभेसमोर ठेवण्यात यावे, उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने...

ठळक मुद्देराहुल पावडे : मनपाच्या आढावा सभेत १५ दिवसांचा अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुंठेवारीत चंद्रपूर शहरातील तब्बल अडीच हजारांवर प्रकरणे प्राप्त झाली आहेत. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे सभेसमोर ठेवण्यात यावे, उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करावी व त्यासंबंधीचा अहवाल १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिले आहे.महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित गुंठेवारी प्रकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त बालचंद्र बेहेरे, नगररचना विभागाचे सगरे, बाहेकर, गौतम, भोयर, देवतळे उपस्थित होते. महानगरपालिकेच्या नगरचना विभागाकडे प्राप्त एकूण प्रकरणातील ७३८ प्रकरणे संबंधीतांना कळविण्यात आली आहेत. उर्वरीत एक हजार ३८० प्रकरणांची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे लवकर निकाली निघू शकतात. त्यामुळे सभेसमोर ठेऊन ही प्रकरणे निकाली काढावे. रस्त्यांची व्याप्ती लक्षात घेऊन मनपा अधिनियमानुसार असलेली प्रकरणे अधिकाºयांनी निकली काढावे, असे निर्देश पावडे यांनी यावेळी दिले.गुंठेवारीसंदर्भात दोन महिन्यांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. बसस्थानक, शाळा, उद्यानाची प्रकरणे वेगळी करा, पुरबाधित क्षेत्रातील पाचशे ते सातशे प्रकरणे आहेत. या प्रकरणांना नाहरकत प्रमाणपत्र देणे शक्य नाही. परंतु सिंचन विभागाच्या अधिकाºयांशी बैठक घेऊन तोडगा काढला जाऊ शकते, असे सुतोवाच पावडे यांनी केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पावडे यांनी ही बैठक बोलावली होती.शासनाच्या निर्देशानुसारच कामे व्हायला हवीत. महानगरपालिका ही संस्था आहे. गुंठेवारीने महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदतच होणार आहे. त्यामुळे अधिकाºयांनी गांभीर्याने प्रकरणे निकाली काढण्याच्या कामाची गती वाढवावी. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करूनच अहवाल १५ दिवसांत सादर करावा, जेणेकरुन प्रकरणातील त्रुटी दूर करता येऊ शकतील, असेही पावडे म्हणाले.मनपाच्या उत्पन्नात वाढ होणारगुंठेवारीची प्रकरणे निकाली निघाल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी उत्पन्नात वाढ व्हावी यादृष्टीने ही प्रकरणे तात्काळ निकाली काढावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच अधिकाºयांकडून वेळेत काम पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. शहरातील गुंठेवारीची प्रकरणे निकाली काढण्याचे काम अनेक वर्षे बंद होते. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकणातून मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.