शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

गुंठेवारीचा अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:07 IST

गुंठेवारीत चंद्रपूर शहरातील तब्बल अडीच हजारांवर प्रकरणे प्राप्त झाली आहेत. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे सभेसमोर ठेवण्यात यावे, उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने...

ठळक मुद्देराहुल पावडे : मनपाच्या आढावा सभेत १५ दिवसांचा अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुंठेवारीत चंद्रपूर शहरातील तब्बल अडीच हजारांवर प्रकरणे प्राप्त झाली आहेत. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे सभेसमोर ठेवण्यात यावे, उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करावी व त्यासंबंधीचा अहवाल १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिले आहे.महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित गुंठेवारी प्रकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त बालचंद्र बेहेरे, नगररचना विभागाचे सगरे, बाहेकर, गौतम, भोयर, देवतळे उपस्थित होते. महानगरपालिकेच्या नगरचना विभागाकडे प्राप्त एकूण प्रकरणातील ७३८ प्रकरणे संबंधीतांना कळविण्यात आली आहेत. उर्वरीत एक हजार ३८० प्रकरणांची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी. आरक्षित क्षेत्रातील प्रकरणे लवकर निकाली निघू शकतात. त्यामुळे सभेसमोर ठेऊन ही प्रकरणे निकाली काढावे. रस्त्यांची व्याप्ती लक्षात घेऊन मनपा अधिनियमानुसार असलेली प्रकरणे अधिकाºयांनी निकली काढावे, असे निर्देश पावडे यांनी यावेळी दिले.गुंठेवारीसंदर्भात दोन महिन्यांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. बसस्थानक, शाळा, उद्यानाची प्रकरणे वेगळी करा, पुरबाधित क्षेत्रातील पाचशे ते सातशे प्रकरणे आहेत. या प्रकरणांना नाहरकत प्रमाणपत्र देणे शक्य नाही. परंतु सिंचन विभागाच्या अधिकाºयांशी बैठक घेऊन तोडगा काढला जाऊ शकते, असे सुतोवाच पावडे यांनी केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पावडे यांनी ही बैठक बोलावली होती.शासनाच्या निर्देशानुसारच कामे व्हायला हवीत. महानगरपालिका ही संस्था आहे. गुंठेवारीने महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदतच होणार आहे. त्यामुळे अधिकाºयांनी गांभीर्याने प्रकरणे निकाली काढण्याच्या कामाची गती वाढवावी. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करूनच अहवाल १५ दिवसांत सादर करावा, जेणेकरुन प्रकरणातील त्रुटी दूर करता येऊ शकतील, असेही पावडे म्हणाले.मनपाच्या उत्पन्नात वाढ होणारगुंठेवारीची प्रकरणे निकाली निघाल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी उत्पन्नात वाढ व्हावी यादृष्टीने ही प्रकरणे तात्काळ निकाली काढावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच अधिकाºयांकडून वेळेत काम पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. शहरातील गुंठेवारीची प्रकरणे निकाली काढण्याचे काम अनेक वर्षे बंद होते. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकणातून मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.