शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

दोन डॉक्टरांवर उपजिल्हा रुग्णालयाचा भार

By admin | Updated: June 14, 2016 00:38 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे एकमेव असे शहर असून जेथून यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा शहराकडे जाण्याचा मार्ग आहे...

वरोऱ्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त : जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे एकमेव असे शहर असून जेथून यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा शहराकडे जाण्याचा मार्ग आहे व नियमित बससेवाही उपलब्ध आहेत. महामार्गावर वर्दळ राहत असल्यामुळे दररोज अपघात घडत असतात. त्या रूग्णांना येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. मात्र येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त असून केवळ दोन डॉक्टरांच्या भरवश्यावर येथील कारभार सुरू आहे. वरोरा शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगीक वसाहतीचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. राज्य महामार्गावर वसलेले हे शहर तीन जिल्ह्याचा मध्यभागी आहे. त्यामुळे येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रूग्णालय आहे. पण ‘नाम बडे और दर्शन खोटे’ अशी परिस्थिती या रुग्णालयाची झाली आहे. येथील अनेक पदे रिक्त आहेत. तर महत्त्वाचे पद असलेले वैद्यकीय अधिकारी यांची संख्या सात असताना पाच जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. याकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले असून जिल्हा प्रशासनानेही लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. गेल्या एक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयात रिक्त पदांचे ग्रहण लागले असून जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणारे लोकप्रतिनिधीही मात्र गप्प का? असा सवालही आता नागरिक विचारू लागले आहेत. आज शहराची लोकसंख्या पन्नास हजाराचा वर आहे. परंतु, उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर येथील कारभार सुरू आहे. सहायक वैद्यकीय अधिक्षक, कनिष्ठ लिपीक आणि लॅब अटेन्डेन्ट, एक स्टाफ नर्स, दोन इंचार्ज सिस्टर तर चार परिचरच्या जागाही रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांचा उपचाराकरिता अडचणी येत असून याबाबत आरोग्य विभाग व राज्य शासनाला वारंवार लक्षात आणून देऊनही रिक्त पदे भरण्याकरिता कोणत्याही हालचाली झालेल्या नाही. त्यामुळे नागरिकांत रोष पसरला आहे. (शहर प्रतिनिधी)रिक्त पदांमुळे आम्हालाही त्रास सहन करावा लागत आहे. एमएलसी, ओपीडी, इमरजेसी रुग्ण असतात. मात्र दोन डॉक्टरांना सर्व काम करावी लागत आहे. दोन डॉक्टरांच्या भरवश्यावर दवाखाना चालू शकत नाही. लवकरात लवकर रिक्त पदे भरायला हवे किंवा डिपुटेशनला गेलेल्या डॉक्टरांना परत बोलाविणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.- गो.वा. भगत, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा