शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

दोन डॉक्टरांवर उपजिल्हा रुग्णालयाचा भार

By admin | Updated: June 14, 2016 00:38 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे एकमेव असे शहर असून जेथून यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा शहराकडे जाण्याचा मार्ग आहे...

वरोऱ्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त : जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे एकमेव असे शहर असून जेथून यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा शहराकडे जाण्याचा मार्ग आहे व नियमित बससेवाही उपलब्ध आहेत. महामार्गावर वर्दळ राहत असल्यामुळे दररोज अपघात घडत असतात. त्या रूग्णांना येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. मात्र येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त असून केवळ दोन डॉक्टरांच्या भरवश्यावर येथील कारभार सुरू आहे. वरोरा शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगीक वसाहतीचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. राज्य महामार्गावर वसलेले हे शहर तीन जिल्ह्याचा मध्यभागी आहे. त्यामुळे येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रूग्णालय आहे. पण ‘नाम बडे और दर्शन खोटे’ अशी परिस्थिती या रुग्णालयाची झाली आहे. येथील अनेक पदे रिक्त आहेत. तर महत्त्वाचे पद असलेले वैद्यकीय अधिकारी यांची संख्या सात असताना पाच जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. याकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले असून जिल्हा प्रशासनानेही लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. गेल्या एक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयात रिक्त पदांचे ग्रहण लागले असून जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणारे लोकप्रतिनिधीही मात्र गप्प का? असा सवालही आता नागरिक विचारू लागले आहेत. आज शहराची लोकसंख्या पन्नास हजाराचा वर आहे. परंतु, उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर येथील कारभार सुरू आहे. सहायक वैद्यकीय अधिक्षक, कनिष्ठ लिपीक आणि लॅब अटेन्डेन्ट, एक स्टाफ नर्स, दोन इंचार्ज सिस्टर तर चार परिचरच्या जागाही रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांचा उपचाराकरिता अडचणी येत असून याबाबत आरोग्य विभाग व राज्य शासनाला वारंवार लक्षात आणून देऊनही रिक्त पदे भरण्याकरिता कोणत्याही हालचाली झालेल्या नाही. त्यामुळे नागरिकांत रोष पसरला आहे. (शहर प्रतिनिधी)रिक्त पदांमुळे आम्हालाही त्रास सहन करावा लागत आहे. एमएलसी, ओपीडी, इमरजेसी रुग्ण असतात. मात्र दोन डॉक्टरांना सर्व काम करावी लागत आहे. दोन डॉक्टरांच्या भरवश्यावर दवाखाना चालू शकत नाही. लवकरात लवकर रिक्त पदे भरायला हवे किंवा डिपुटेशनला गेलेल्या डॉक्टरांना परत बोलाविणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.- गो.वा. भगत, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा