शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयात विकत घ्यावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:11 IST

उपजिल्हा रूग्णालयात लावलेली शुद्ध व थंड पाण्याची यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली आहे. शासकीय रूग्णालयात उपचार मोफत मिळत असले तरी रुग्ण व आप्तेष्टांना हॉटेलांतून पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ठळक मुद्देजलशुद्धीकरण संयंत्र बंद : रूग्णांचे नातेवाईक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : उपजिल्हा रूग्णालयात लावलेली शुद्ध व थंड पाण्याची यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली आहे. शासकीय रूग्णालयात उपचार मोफत मिळत असले तरी रुग्ण व आप्तेष्टांना हॉटेलांतून पाणी विकत घ्यावे लागत आहे.उपजिल्हा रुग्णालयाला वरोरा शहर, माढेळी, नागरी, कोनरसार, सावरी हे आरोग्य केंद्र तर शेगाव, टेमुर्डा येथील आरोग्य उपकेंद्र जोडण्यात आले आहेत. यासोबतच माजरी, वरोरा, शेगाव पोलीस ठाणेही उपजिल्हा रुग्णालयाला जोडले गेले आहे. नागपूर- चंद्रपूर राज्य मार्ग, नवी दिल्ली- चेन्नई रेल्वे मार्गावर अपघात झाल्यास याच उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. ओपीडीमध्ये दररोज शेकडोे रुग्णांवर उपचार होतो. शिवाय, शेकडो शस्त्रक्रियाही केल्या जातात. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या आप्तेष्टांची मोठी गर्दी असते. पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याकरिता रुग्णालयातील शुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आले आहे. परंतु, तिनही संयंत्र मागील तीन दिवसांपासून बंद आहेत. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. ही परिस्थिती मागील काही दिवसांपासून कायम असताना रुग्णालय प्रशासनाने पर्यायी उपाययोजना केली नाही. परिणामी, रुग्णांना शुद्ध व थंड पाणी मिळावे दुरापास्त झाले आहे. दररोज शेकडो रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात मोफत केले जात असले तरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता तालुक्यातील सर्वसामान्य गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांना आता पिण्याचे पाणी मिळविण्याकरिता हॉटेलांत जावे लागत आहे.पाणी ही मूलभूत गरज असताना संबंधित अधिकाऱ्यांनी शुद्धीकरण संयंत्रांची दुरूस्ती करून समस्या सोडविली नाही. गावखेड्यातून आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. नागरिक नाराज आहेत. उपाययोजनेसंदर्भात जाणून घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोराचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन सातभाई यांच्याशी संपर्क साधला. पण होऊ शकला नाही.ओपीडीमध्ये शेकडो रुग्णांची गर्दीउपजिल्हा रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांमध्ये सर्वसामान्यांची संख्या अधिक आहे. रूग्णांवर निशुल्क उपचार केले जाते. परंतु, पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.