शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

एसएमएसद्वारे मिळणार विद्यार्थ्यांना निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी १५ मार्चपासून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता प्रथम पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयांसह सर्वच बंद झाले.

ठळक मुद्देसंभ्रम दूर : पुढील सत्राचा अभ्यास होणार सुलभ

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षाच झाली नसल्याने निकाल कसा लागणार आणि पुढील वर्गात कसे जाणार, असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना पडला असतानाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी पत्र काढून शैक्षणिक सत्र २०१९-२० चा निकाल पालकांच्या दूरध्वनीवर, एसएमएस व इतर ऑनलाईन पद्धतीने तत्काळ कळविण्याच्या सुचना केल्या आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात निकाल लागणार असून विद्यार्थ्यांचा पुढील वर्गात जाण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी १५ मार्चपासून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता प्रथम पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयांसह सर्वच बंद झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा, महाविद्यालय सुरु होऊन परीक्षा होतील, अशी विद्यार्थ्यांची आशा असतानाच लॉकडाऊन तब्बल दोन वेळा वाढविण्यात आला. दरम्यान, शिक्षण विभागाने प्रथम पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेल्याने नववी आणि अकरावीचीही परीक्षा रद्द करण्यात आली. एवढेच नाही तर दहावीचा शेवटचा पेपरही रद्द करण्याची वेळ यावर्षी प्रथमच शिक्षण मंडळावर आली. परीक्षा झाली नसल्यामुळे पुढील वर्गात कसे जाणार तसेच लॉकडाऊन नंतर शाळा परीक्षा घेणार की, काय असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना मनात उपस्थित केले जात होते. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळांना मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याचे आदेश दिल्यानंतर शाळा प्रशासन विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात गुंतले आहे. त्यानंतर आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी एक पत्र काढून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास उपलब्ध साहित्याच्या आधारे करणे सोपे व्हावे यासाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा निकाल दूरध्वनी, एसएमएस तसेच इतर आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना तत्काळ कळविण्याच्या सुचना केल्या आहे. या पत्रामुळे शिक्षकांना आता विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल कळविण्यासंदर्भात लवरच पाऊल उचलावे लागणार असून विद्यार्थी तसेच पालकांची चिंता दूर होणार आहे.मूल्यमापनाद्वारे मिळणार गुणकोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावावा यासाठी प्रथम शिक्षक संभ्रमात होते. यासाठी शिक्षण मंडळाने मुल्यमापनाद्वारे निकाल लावण्याच्या सूचना दिल्यानंतर शिक्षकांनी तशी तयारी सुरु केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्र्षातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाचा निकाल तयार करण्यासाठी शैक्षणिक सत्र दोनचे मूल्यमापन करून गुण देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Educationशिक्षण