शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

एसएमएसद्वारे मिळणार विद्यार्थ्यांना निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी १५ मार्चपासून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता प्रथम पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयांसह सर्वच बंद झाले.

ठळक मुद्देसंभ्रम दूर : पुढील सत्राचा अभ्यास होणार सुलभ

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षाच झाली नसल्याने निकाल कसा लागणार आणि पुढील वर्गात कसे जाणार, असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना पडला असतानाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी पत्र काढून शैक्षणिक सत्र २०१९-२० चा निकाल पालकांच्या दूरध्वनीवर, एसएमएस व इतर ऑनलाईन पद्धतीने तत्काळ कळविण्याच्या सुचना केल्या आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात निकाल लागणार असून विद्यार्थ्यांचा पुढील वर्गात जाण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी १५ मार्चपासून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता प्रथम पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयांसह सर्वच बंद झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा, महाविद्यालय सुरु होऊन परीक्षा होतील, अशी विद्यार्थ्यांची आशा असतानाच लॉकडाऊन तब्बल दोन वेळा वाढविण्यात आला. दरम्यान, शिक्षण विभागाने प्रथम पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेल्याने नववी आणि अकरावीचीही परीक्षा रद्द करण्यात आली. एवढेच नाही तर दहावीचा शेवटचा पेपरही रद्द करण्याची वेळ यावर्षी प्रथमच शिक्षण मंडळावर आली. परीक्षा झाली नसल्यामुळे पुढील वर्गात कसे जाणार तसेच लॉकडाऊन नंतर शाळा परीक्षा घेणार की, काय असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना मनात उपस्थित केले जात होते. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळांना मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याचे आदेश दिल्यानंतर शाळा प्रशासन विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात गुंतले आहे. त्यानंतर आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी एक पत्र काढून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास उपलब्ध साहित्याच्या आधारे करणे सोपे व्हावे यासाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा निकाल दूरध्वनी, एसएमएस तसेच इतर आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना तत्काळ कळविण्याच्या सुचना केल्या आहे. या पत्रामुळे शिक्षकांना आता विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल कळविण्यासंदर्भात लवरच पाऊल उचलावे लागणार असून विद्यार्थी तसेच पालकांची चिंता दूर होणार आहे.मूल्यमापनाद्वारे मिळणार गुणकोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावावा यासाठी प्रथम शिक्षक संभ्रमात होते. यासाठी शिक्षण मंडळाने मुल्यमापनाद्वारे निकाल लावण्याच्या सूचना दिल्यानंतर शिक्षकांनी तशी तयारी सुरु केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्र्षातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाचा निकाल तयार करण्यासाठी शैक्षणिक सत्र दोनचे मूल्यमापन करून गुण देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Educationशिक्षण