शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात चमकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:54 IST

केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नांदगाव (पोडे) येथे बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. शिक्षकांनी कल्पकतेतून गुणवत्ता वाढीसोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी निश्चितपणे चमकतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी नांदगाव (पोडे) येथे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर दरम्यान नांदगाव (पोडे) येथे सुरू आहे. अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार, गटविकास अधिकारी संध्या दिकोंडवार, नांदगावचे सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, मनपाचे नगरसेवक राहूल सराफ, शाम कनकम, माजी जि.प. सदस्य मनोहर देऊळकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, माजी सरपंच मधुकर पोडे, गुलाब उपरे, तंमुस अध्यक्ष संजय टेकाम, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ मुक्के, सुनील शेंडे, आदींची उपस्थिती होती.ना. अहीर म्हणाले, सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण शहराच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून प्रगत शैक्षणिक धोरण राबविले जाते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा डीजिटल केल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी आदर्श घडावा, हाच या स्पर्धेचा हेतू आहे. पहिल्या वर्गापासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर स्वच्छता राखण्यासाठी आतापासून संस्कार करण्याची गरज असून निरामय आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शोभा मडावी तर संचालन क्रीडा सचिव दिलीप इटनकर यांनी केले. स्पर्धेत विविध शाळा सहभागी झाल्या आहेत.पाचशे विद्यार्थ्यांचा रंगणार सांस्कृतिक सोहळाबल्लारपूर पंचायत समितीच्या विसापूर व कोठारी बिटातील २८ जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ५४० विद्यार्थ्यांचा नांदगाव (पोडे) येथील क्रीडांगणावर क्रीडा व सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. दर्शनीय कवायतीच्या माध्यमातून चिमुकल्या बालकांनी देखणी व उत्कृष्ठ कला प्रदर्शित करून साºयांचे लक्ष वेधले. कबड्डी, खो-खो, वैयक्तीक व सांघिक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नांदगाव (पोडे) व परिसरातील नागरिकांना सोहळ्यातून मिळणार आहे.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर