शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात चमकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:54 IST

केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नांदगाव (पोडे) येथे बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : केंद्र व राज्याचे शैक्षणिक धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. त्यासाठी शासनासोबतच शिक्षकांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. शिक्षकांनी कल्पकतेतून गुणवत्ता वाढीसोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी निश्चितपणे चमकतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी नांदगाव (पोडे) येथे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर दरम्यान नांदगाव (पोडे) येथे सुरू आहे. अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार, गटविकास अधिकारी संध्या दिकोंडवार, नांदगावचे सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, मनपाचे नगरसेवक राहूल सराफ, शाम कनकम, माजी जि.प. सदस्य मनोहर देऊळकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, माजी सरपंच मधुकर पोडे, गुलाब उपरे, तंमुस अध्यक्ष संजय टेकाम, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ मुक्के, सुनील शेंडे, आदींची उपस्थिती होती.ना. अहीर म्हणाले, सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण शहराच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून प्रगत शैक्षणिक धोरण राबविले जाते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा डीजिटल केल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी आदर्श घडावा, हाच या स्पर्धेचा हेतू आहे. पहिल्या वर्गापासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर स्वच्छता राखण्यासाठी आतापासून संस्कार करण्याची गरज असून निरामय आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शोभा मडावी तर संचालन क्रीडा सचिव दिलीप इटनकर यांनी केले. स्पर्धेत विविध शाळा सहभागी झाल्या आहेत.पाचशे विद्यार्थ्यांचा रंगणार सांस्कृतिक सोहळाबल्लारपूर पंचायत समितीच्या विसापूर व कोठारी बिटातील २८ जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ५४० विद्यार्थ्यांचा नांदगाव (पोडे) येथील क्रीडांगणावर क्रीडा व सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. दर्शनीय कवायतीच्या माध्यमातून चिमुकल्या बालकांनी देखणी व उत्कृष्ठ कला प्रदर्शित करून साºयांचे लक्ष वेधले. कबड्डी, खो-खो, वैयक्तीक व सांघिक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नांदगाव (पोडे) व परिसरातील नागरिकांना सोहळ्यातून मिळणार आहे.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर