शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST

चंद्रपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात यावर्षी सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या फक्त दोन फेऱ्या झाल्या. कोरोनाचा प्रतिकूल परिणाम अभियांत्रिकीच्या प्रथम व ...

चंद्रपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात यावर्षी सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या फक्त दोन फेऱ्या झाल्या. कोरोनाचा प्रतिकूल परिणाम अभियांत्रिकीच्या प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेवरही झाला. प्रवासाची अडचण, प्रक्रियेच्या तारखांची नेमकी माहिती उपलब्ध नसणे आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्याची मागणी जिल्हा विद्यार्थी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.

राज्य शासनाने मार्च २०२० मध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार सत्र २०२०-२१ मध्ये जे विद्यार्थी सामाईक प्रवेश प्रक्रियेव्यतिरिक्त किंवा नंतर प्रवेश घेतील, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती मिळणार नाही, असे जाहीर केले. हा निर्णय अन्यायकारक ठरणार आहे. चंद्रपूरसारख्या ग्रामीण व आदिवासीबहुल जिल्ह्यात मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. दोन फेऱ्यांनंतर हे विद्यार्थी प्रवेशापासून दूर राहिले. अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेतच. कोरोनामुळे सर्व पातळ्यांवर निर्माण झालेल्या अडचणी बघता हे विद्यार्थी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती न घेता अभियांत्रिकी शिक्षण घेणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास, उन्नत गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती वा शिष्यवृत्ती देण्याची मागणी जिल्हा विद्यार्थी काँग्रेसने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, कृष्णा रेड्डी, रक्षित अन्नालकर, प्रणय साठे, शंतनू सातपुते, गोविंदा अमृतकर उपस्थित होते.