शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पोषण आहाराला विद्यार्थ्यांचा नकार

By admin | Updated: June 9, 2015 01:36 IST

उन्हाळी सुट्यांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला विद्यार्थ्यांनी स्वत:हून नकार दिल्याने शाळेत पोषण आहाराची

उन्हाचा तडाखा : शाळेत चूल पेटलीच नाहीखांबाडा : उन्हाळी सुट्यांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला विद्यार्थ्यांनी स्वत:हून नकार दिल्याने शाळेत पोषण आहाराची चुल पेटलीच नसल्याचे वास्तव्य आहे. अनेक शाळांत साहित्यच नसून घरी पोटभर जेवन मिळताना नुसत्या वरण भातासाठी विद्यार्थी शाळेत जाणार कशाला, असे पालकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याची अनेक गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शासनाने या गावांत काही विशेष योजना लागु केल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कुपोषणाची लागण होऊ नये म्हणून उन्हाळ्याच्या सुटीतही शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले. विद्यार्थी वरण, भात खाण्यासाठीच दररोज शाळेत येतील काय, हा प्रश्न सुरुवातीलाच समोर आला. आता १० मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या. सुट्या लागण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी दररोज शाळेत येण्याचे निमंत्रणही दिले. मात्र तरी सुद्धा विद्यार्थी शाळेपासून दूर पळाले. परिणामी कोणत्याही शाळेत पोषण आहार घेण्यासाठी विद्यार्थी फिरकले नसल्याचे दिसून येत आहे. तर काही शाळांमध्ये पोषण आहारच शिजविण्याकरीता उपलब्ध नाही.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मधल्या दीर्घ विश्रांती दरम्यान पोषण आहाराचे वाटप केले जाते. यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्रॉम तांदळाचा भात व त्यासोबत तुरदाळ किंवा मुंगदाळीचे वरण अथवा चवळी, वटाणा, हरभरा याची मिसळ दिले जात. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५० ग्रॉम तांदळाचा भात व सोबत वरण किंवा मिसळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्या आहारातून विद्यार्थ्यांना पोषक द्रव्ये मिळतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. गरीब कुटुंबाच्या घरीही पोळी, भात, भाजी, वरण या पदार्थांचा जेवणामध्ये नेहमीच समावेश असतो. घरी पोटभर अन्न मिळत असताना नुसते वरण भात खाण्यासाठी जाणार कशाला असा प्रश्न आहे. (वार्ताहर)