शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराला विद्यार्थ्यांचा नकार

By admin | Updated: June 9, 2015 01:36 IST

उन्हाळी सुट्यांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला विद्यार्थ्यांनी स्वत:हून नकार दिल्याने शाळेत पोषण आहाराची

उन्हाचा तडाखा : शाळेत चूल पेटलीच नाहीखांबाडा : उन्हाळी सुट्यांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला विद्यार्थ्यांनी स्वत:हून नकार दिल्याने शाळेत पोषण आहाराची चुल पेटलीच नसल्याचे वास्तव्य आहे. अनेक शाळांत साहित्यच नसून घरी पोटभर जेवन मिळताना नुसत्या वरण भातासाठी विद्यार्थी शाळेत जाणार कशाला, असे पालकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याची अनेक गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शासनाने या गावांत काही विशेष योजना लागु केल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कुपोषणाची लागण होऊ नये म्हणून उन्हाळ्याच्या सुटीतही शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले. विद्यार्थी वरण, भात खाण्यासाठीच दररोज शाळेत येतील काय, हा प्रश्न सुरुवातीलाच समोर आला. आता १० मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या. सुट्या लागण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी दररोज शाळेत येण्याचे निमंत्रणही दिले. मात्र तरी सुद्धा विद्यार्थी शाळेपासून दूर पळाले. परिणामी कोणत्याही शाळेत पोषण आहार घेण्यासाठी विद्यार्थी फिरकले नसल्याचे दिसून येत आहे. तर काही शाळांमध्ये पोषण आहारच शिजविण्याकरीता उपलब्ध नाही.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मधल्या दीर्घ विश्रांती दरम्यान पोषण आहाराचे वाटप केले जाते. यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्रॉम तांदळाचा भात व त्यासोबत तुरदाळ किंवा मुंगदाळीचे वरण अथवा चवळी, वटाणा, हरभरा याची मिसळ दिले जात. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५० ग्रॉम तांदळाचा भात व सोबत वरण किंवा मिसळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्या आहारातून विद्यार्थ्यांना पोषक द्रव्ये मिळतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. गरीब कुटुंबाच्या घरीही पोळी, भात, भाजी, वरण या पदार्थांचा जेवणामध्ये नेहमीच समावेश असतो. घरी पोटभर अन्न मिळत असताना नुसते वरण भात खाण्यासाठी जाणार कशाला असा प्रश्न आहे. (वार्ताहर)