शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

सावरगावातील शाळेला विद्यार्थ्यांनीच ठोकले कुलूप

By admin | Updated: December 16, 2015 01:21 IST

मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते.

आदेशाची पायमल्ली : ११ दिवसांपासून विद्यार्थी अध्ययनापासून वंचितखडसंगी : मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.व्ही. डोर्लीकर यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करीत मुख्याध्यापकांना इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांना रूजू करण्याचे तोंडी आदेश देत व्हिजीट बुकवर नोंद केली. मात्र मुख्याध्यापक डी.डी. पवार यांनी संबंधित शिक्षकांना रूजू न करता शाळेतून पोबारा केला. त्यामुळे संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवारी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन तिव्र केले आहे.चिमूर येथील क्रीडा शिक्षक विकास मंडळाद्वारे सावरगाव येथे १९८७ पासून सर्वांग विकास विद्यालय चालविले जात आहे. या शाळेत परिसरातील कारघाटा, चिखलापार, खरकाडा, गावातील विद्यार्थी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षणाचे धडे घेतात मात्र संस्था चालकाच्या मनमानी कारभारामुळे शाळेवर कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही तर तासिका तत्वावर शिक्षकांच्या अनधिकृत नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे.मागील तीन महिन्यांपासून इंग्रजी व गणित विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी ४ डिसेंबरला शाळेवर बहिष्कार टाकत शाळेत जाणे बंद केले. या आंदोलनाने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली होती. या आंदोलनाची शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी दखल घेत शाळेत येवून पालक व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांना रूजू करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी अलोणे नामक शिक्षिका व चौधरी नामक शिक्षक रूजू होण्यासाठी आले असता, मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना रूजू करण्यास नकार दिला व दुपारी शाळेतून पोबारा केला. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी संतप्त होवून शाळेला कुलूप ठोकले. शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला बगल देणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी करीत संतप्त पालकांनी मंगळवारी चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयत धडक दिली. संस्था चालकांच्या वादात आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई करण्यात येत नाही व आमच्या मागण्यापूर्ण होईपर्यंत आम्ही शाळेचे कुलूप काढणार नसल्याचा पवित्र पालक व विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)शिक्षकांचा बैठा सत्याग्रहनियमितपणे शिक्षक शाळेवर आले. मात्र शाळेला पालक व विद्यार्थ्यांनी कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षकांना शैक्षणिक कार्य करता न आल्याने दरी टाकून शाळेच्या पटांगणात आपले कर्तव्य पार पाडावे लागले. पिण्याच्या पाण्यासाठीही शिक्षकांना गावात जावे लागत होते. शालेय दस्याऐवज नसल्याने नवीन रजिस्टर आणून आपली उपस्थिती दाखवित इतर कामे करावी लागली.