शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

सावरगावातील शाळेला विद्यार्थ्यांनीच ठोकले कुलूप

By admin | Updated: December 16, 2015 01:21 IST

मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते.

आदेशाची पायमल्ली : ११ दिवसांपासून विद्यार्थी अध्ययनापासून वंचितखडसंगी : मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.व्ही. डोर्लीकर यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करीत मुख्याध्यापकांना इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांना रूजू करण्याचे तोंडी आदेश देत व्हिजीट बुकवर नोंद केली. मात्र मुख्याध्यापक डी.डी. पवार यांनी संबंधित शिक्षकांना रूजू न करता शाळेतून पोबारा केला. त्यामुळे संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवारी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन तिव्र केले आहे.चिमूर येथील क्रीडा शिक्षक विकास मंडळाद्वारे सावरगाव येथे १९८७ पासून सर्वांग विकास विद्यालय चालविले जात आहे. या शाळेत परिसरातील कारघाटा, चिखलापार, खरकाडा, गावातील विद्यार्थी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षणाचे धडे घेतात मात्र संस्था चालकाच्या मनमानी कारभारामुळे शाळेवर कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही तर तासिका तत्वावर शिक्षकांच्या अनधिकृत नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे.मागील तीन महिन्यांपासून इंग्रजी व गणित विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी ४ डिसेंबरला शाळेवर बहिष्कार टाकत शाळेत जाणे बंद केले. या आंदोलनाने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली होती. या आंदोलनाची शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी दखल घेत शाळेत येवून पालक व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांना रूजू करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी अलोणे नामक शिक्षिका व चौधरी नामक शिक्षक रूजू होण्यासाठी आले असता, मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना रूजू करण्यास नकार दिला व दुपारी शाळेतून पोबारा केला. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी संतप्त होवून शाळेला कुलूप ठोकले. शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला बगल देणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी करीत संतप्त पालकांनी मंगळवारी चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयत धडक दिली. संस्था चालकांच्या वादात आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई करण्यात येत नाही व आमच्या मागण्यापूर्ण होईपर्यंत आम्ही शाळेचे कुलूप काढणार नसल्याचा पवित्र पालक व विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)शिक्षकांचा बैठा सत्याग्रहनियमितपणे शिक्षक शाळेवर आले. मात्र शाळेला पालक व विद्यार्थ्यांनी कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षकांना शैक्षणिक कार्य करता न आल्याने दरी टाकून शाळेच्या पटांगणात आपले कर्तव्य पार पाडावे लागले. पिण्याच्या पाण्यासाठीही शिक्षकांना गावात जावे लागत होते. शालेय दस्याऐवज नसल्याने नवीन रजिस्टर आणून आपली उपस्थिती दाखवित इतर कामे करावी लागली.