शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

वसतिगृहात विद्यार्थ्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:47 IST

आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर राहून उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली.

ठळक मुद्देकेविलवाणी अवस्था : शिक्षणासाठी घरदार सोडून आलेल्या विद्यार्थ्यांचा समस्यांशी सामना

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर राहून उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली. मात्र अधिकारी व कर्मचाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे वसतिगृहात विविध समस्यांचे निवारण करण्यात येत नाही. चंद्रपुरातील शासकीय वसतिगृह क्रमांक २ मध्ये तर विद्यार्थ्यांची अक्षरश: होरपळ सुरु आहे.आदिवासी समाजाचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन प्रगतीपदावर पोहचावा, यासाठी समाजकल्याण विभागाद्वारे तसेच आदिवासी विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शासकीय निवासी वसतिगृहाची सोय करण्यात आली. त्यानुसार चंद्रपूर येथे सन २०१० ला तुकूम परिसरात शासकीय वसतिगृह क्रमांक २ सुरु करण्यात आले. या वसतिगृहामध्ये २५० विद्यार्थी प्रवेश क्षमता असून गुणवत्तेच्या आधारावर वसतिगृहात बारावी ते पदवीधारक, तसेच विविध पदविकाचे शिक्षण घेणारे १०६ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मात्र वसतिगृहात अनेक समस्या असल्याने विद्यार्थ्यांची या वसतिगृहात होरपळ होत आहे. त्यांच्या समस्यांकडे संबंधित अधिकारीवर्गांचे लक्ष जावे, यासाठी या विद्यार्थ्यांना चक्क उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला. शनिवारपासून विद्यार्थ्यांनी उपोषण सुरु केले आहे.बेडअभावी विद्यार्थी झोपतात खालीवसतिगृहातील विद्यार्थ्यांंना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था शासनाकडून करण्यात येते. मात्र या वसतिगृहातील एकाच रुममध्ये १५ ते २० विद्यार्थ्यांची सोय केली आहे. मात्र त्याठिकाणी मोजक्याच खाटा असल्यामुळे विद्यार्थ्यांना फरशीवर झोपावे लागत आहे.तुटलेल्या ताटात जेवणविद्यार्थ्यांना तुटलेल्या ताटात जेवण दिले जाते. त्यामुळे बहुतेकदा जेवण करताना अर्धे अन्न खाली पडत असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. जेवायलाही धड ताट दिले जात नाही, तिथे इतर व्यवस्था कशी असेल, याची जाणीव येते. अधिकाºयांचे याकडे कायम दुर्लक्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुटलेल्या ताटात जेवण करावे लागत आहे.स्वच्छतागृहात साचले पाणीयेथील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे स्वच्छतागृहात पाणी साचले आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकदा तक्रार करुनही कोणत्याही अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना तशाच अवस्थेत स्वच्छतागृहातील कामे करावी लागत आहे.परिसरात कचºयाचे साम्राज्यवसतिगृहाच्या परिसरातील स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे तयार झाली आहेत. मात्र त्याची स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी निघत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे.२५० विद्यार्थ्यांना एकच वॉटरकूलरशासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एकच वॉटरकूलरची व्यवस्था आहे. ते वॉटरकूलरसुद्धा कधी सुरु तर कधी बंद स्थितीत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत असते.