शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

खिचडीसाठी विद्यार्थी झेडपीत धडकले

By admin | Updated: September 29, 2014 23:02 IST

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील विद्यार्थ्यांना मागील दोन महिन्यांपासून नियमित खिचडी मिळत नसल्याची तक्रार घेऊन तेथील चिमूकले विद्यार्थी चक्क जिल्हा परिषदेवर धडकले. एवढेच नाही तर, त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अभ्यागत कक्षामध्येही प्रवेश घेत न्याय देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या प्रकाराकडे सर्र्वांचे लक्ष लागले होते. जिवती येथून काही अंतरावर असलेल्या आंबेझरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. या कारभाराला ग्रामस्थही कंटाळले आहे. विशेष म्हणजे, शाळा व्यवस्थापन समितीची नेमणूकच केली नसल्याचा प्रकार आज मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उघडकीस आला.येथील शाळेमध्ये दोन महिन्यापूर्वी ज्या महिलांकडे खिचडी शिजविण्याचे कंत्राट होते त्यांनाच पुन्हा खिचडी शिजविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्र्थ्यांची आहे. या मागणीसाठी विद्यार्र्थी तसेच पालकांनी प्र्रथम मुख्याध्यापकाला निवेदन दिले. मात्र त्यांच्या निवेदनाचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर ग्र्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनालाही त्यांनी केराची टोपली दाखविली. शाळेत विद्यार्थ्यांना योग्य दर्जाची खिचडी मिळत नसल्याने मागील पंधरा दिवसापासून काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेही सोडून दिले आहे. मुख्याध्यापक तसेच पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यांच्या धोरणाला कंटाळून शेवटी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली.विद्यार्थी जिल्हा परिषदेत आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे, निवेदन देण्यापूर्र्वी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या आवारात झाडाच्या सावलीत बसले. यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. या प्रकारानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यागत कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था केली. त्यानंतर ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मागण्या पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान मंगळवारी सकाळी १०.३० वााजता शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, सरपंचाची बैठक बोलावून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले.निवेदन देण्यासाठी विद्यार्थ्यांसह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिगांबर ढाले, सरपंच शोभा मडावी, पोलीस पाटील सुर्र्यभान मडावी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)