शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विद्यार्थ्यांनो, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:38 IST

ग्रामीण भागातील शाळा-विद्यालयांत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना वाढीस लागल्या़ त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या बियांपासून सावध राहावे, ......

ठळक मुद्देइको-प्रो : बियांविषयी जिल्हा परिषद शाळांमध्ये जागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील शाळा-विद्यालयांत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना वाढीस लागल्या़ त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या बियांपासून सावध राहावे, यासाठी इको-प्रो संस्थेच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून जागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे़नागभीड तालुक्यातील कोर्धा, सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव, रत्नापूर आणि चंद्रपूर शहरातील एका शाळेत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. अशा घटना सतत घडत असतानाही शालेयस्तरावर तसेच ग्रामीण भागात जागृती केली जात नाही. यातून विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. हा प्रकार टळावा, यासाठी इको-प्रो संस्था, शिक्षण विभाग व आपातकालीन व्यवस्थापन विभाग समितीच्या वतीने नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून जागृती अभियान सुरू करण्यात आले. गावातुन जनजागृती पदयात्रा काढली. विद्यार्थ्यांनी हातात जनजागृती फ लक घेऊन प्रबोधनपर घोषणाबाजी केली. ‘खाऊ नका, खाऊ नका, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका’ या घोषणेने गाव दणाणून गेले होते. इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी चंद्रज्योतीच्या बियांविषयी शास्त्रीय माहिती देऊन जागृती केली. चंद्रज्योतीच्या बियांमुळे काय परिणाम होतात, यासंदर्भात कार्यकर्ते विद्यार्थ्यांना सहजसोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. यावेळी मुख्याध्यापिका सरिता गाजलवार, इको-प्रो शिक्षण विभाग प्रमुख रवी गुरनुले, अभय अमृतकर, अरूण सहारे, शिक्षक अनिल लोणबले, शालिकराम नागापूरे, शालिनी कोचे, सविता कावडकर, संरपच अर्चना नन्नावरे, माजी संरपच दादाजी नन्नावरे, नांदगाव येथीलनम्रता चांदेकर, वर्षा गहाणे, वृंदा गहाणे, अर्चना कुमर,े पोलीस पाटील जया बोरकर, भगवान मेश्राम, नितीन बुरडकर, धमेंद्र लुनावत, अनिल अडगुरवार, रवींद्र गुरनुले, विजय हेडाऊ, संजय सब्बनवार, सुमीत कोहळे, अभय अमृतकर, राजू काहीलकर, बिमल शहा, हरीश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे व ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते़कशी आहे चंद्रज्योती-जेट्रोफा ?चंद्रज्योती, रतनज्योत आणि रान एरंड म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. बिया खाल्यास मुलांना विषबाधा होते. वारंवार उलट्या व ओटी-पोटीत वेदना होतात. तोंडातून फेस येतो. ग्रामीण भागात मुलांना जेट्रोफा वनस्पतीच्या बिया म्हणजे ‘खायचे फळ ’ असा समज आहे. रस्ताच्या कडेला किंवा शाळेमागे व शेतात झुुडुपांसारखी वाढलेली ही वनस्पती पाहायला आकर्षक आहे. त्यामुळे काजुच्या बिया समजून मुले बिया फोडून खातात. यातून विषबाधा होते. शिक्षक व पालक घाबरून प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करतात. मात्र, गावखेड्यांत वेळेवर उपचार मिळत नाही. चंद्रज्योतीच्या बिया न खाण्याबाबत राज्यातील सर्वच शाळांतून जनजागृती करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळांना निर्देश द्यावे. ज्या परिसरात ही वनस्पती असेल तिथे ग्रामपंचायतीमार्फत सूचना फलक लावावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री तथा अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्याकडे इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे.