शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांनो, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:38 IST

ग्रामीण भागातील शाळा-विद्यालयांत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना वाढीस लागल्या़ त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या बियांपासून सावध राहावे, ......

ठळक मुद्देइको-प्रो : बियांविषयी जिल्हा परिषद शाळांमध्ये जागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील शाळा-विद्यालयांत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना वाढीस लागल्या़ त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या बियांपासून सावध राहावे, यासाठी इको-प्रो संस्थेच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून जागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे़नागभीड तालुक्यातील कोर्धा, सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव, रत्नापूर आणि चंद्रपूर शहरातील एका शाळेत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. अशा घटना सतत घडत असतानाही शालेयस्तरावर तसेच ग्रामीण भागात जागृती केली जात नाही. यातून विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. हा प्रकार टळावा, यासाठी इको-प्रो संस्था, शिक्षण विभाग व आपातकालीन व्यवस्थापन विभाग समितीच्या वतीने नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेपासून जागृती अभियान सुरू करण्यात आले. गावातुन जनजागृती पदयात्रा काढली. विद्यार्थ्यांनी हातात जनजागृती फ लक घेऊन प्रबोधनपर घोषणाबाजी केली. ‘खाऊ नका, खाऊ नका, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका’ या घोषणेने गाव दणाणून गेले होते. इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी चंद्रज्योतीच्या बियांविषयी शास्त्रीय माहिती देऊन जागृती केली. चंद्रज्योतीच्या बियांमुळे काय परिणाम होतात, यासंदर्भात कार्यकर्ते विद्यार्थ्यांना सहजसोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. यावेळी मुख्याध्यापिका सरिता गाजलवार, इको-प्रो शिक्षण विभाग प्रमुख रवी गुरनुले, अभय अमृतकर, अरूण सहारे, शिक्षक अनिल लोणबले, शालिकराम नागापूरे, शालिनी कोचे, सविता कावडकर, संरपच अर्चना नन्नावरे, माजी संरपच दादाजी नन्नावरे, नांदगाव येथीलनम्रता चांदेकर, वर्षा गहाणे, वृंदा गहाणे, अर्चना कुमर,े पोलीस पाटील जया बोरकर, भगवान मेश्राम, नितीन बुरडकर, धमेंद्र लुनावत, अनिल अडगुरवार, रवींद्र गुरनुले, विजय हेडाऊ, संजय सब्बनवार, सुमीत कोहळे, अभय अमृतकर, राजू काहीलकर, बिमल शहा, हरीश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे व ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते़कशी आहे चंद्रज्योती-जेट्रोफा ?चंद्रज्योती, रतनज्योत आणि रान एरंड म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. बिया खाल्यास मुलांना विषबाधा होते. वारंवार उलट्या व ओटी-पोटीत वेदना होतात. तोंडातून फेस येतो. ग्रामीण भागात मुलांना जेट्रोफा वनस्पतीच्या बिया म्हणजे ‘खायचे फळ ’ असा समज आहे. रस्ताच्या कडेला किंवा शाळेमागे व शेतात झुुडुपांसारखी वाढलेली ही वनस्पती पाहायला आकर्षक आहे. त्यामुळे काजुच्या बिया समजून मुले बिया फोडून खातात. यातून विषबाधा होते. शिक्षक व पालक घाबरून प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करतात. मात्र, गावखेड्यांत वेळेवर उपचार मिळत नाही. चंद्रज्योतीच्या बिया न खाण्याबाबत राज्यातील सर्वच शाळांतून जनजागृती करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळांना निर्देश द्यावे. ज्या परिसरात ही वनस्पती असेल तिथे ग्रामपंचायतीमार्फत सूचना फलक लावावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री तथा अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्याकडे इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे.