शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे कायम

By admin | Updated: January 11, 2016 00:49 IST

इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे ओझे घ्यावे लागते. त्यामुळे अगदी कमी वयापासून विद्यार्थ्यांच्या शरीरावर ताण सुरु होतो.

आदेशाचे पालन नाही : मार्गदर्शक सूचनांकडे शाळांचे दुर्लक्षआशिष देरकर गडचांदूरइयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे ओझे घ्यावे लागते. त्यामुळे अगदी कमी वयापासून विद्यार्थ्यांच्या शरीरावर ताण सुरु होतो. शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे किती वजनापर्यंत असले पाहिजे, या संदर्भात शालेय शिक्षण खात्याने शाळांकरिता मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवर अवाजवी ताण पडू नये, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार कोणत्याही शाळांनी अजूनपर्यंत केलेला नाही.पहिल्या इयत्तेच्या मुलांना १.७५ किलोपेक्षा जास्त व सातव्या इयत्तेच्या मुलांना ३.७५ किलोपेक्षा जास्त वजनाची बॅग उचलावी लागू नये, असे निर्देश आहेत. मात्र शाळांनी हा नियम अमलात आणला नाही. शाळकरी मुलांना पाठ्यपुस्तकाखेरीज काहीही सोबत घ्यावे लागणार नाही, याची दक्षता शाळेने घ्यायची आहे. गाईड्स, वर्कबुक तसेच कार्यानुभव वह्या यांची ने-आण त्यांना करावी लागू नये, असेही सांगण्यात आले आहे. मानवी अधिकार आयोगाचे सदस्य न्या. व्ही. जी. मुन्शी यांनी या सूचनांचे चोख पालन झाले पाहिजे, असे शाळांना सांगितले असून पालनात चुकारपना करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण खात्याला दिले आहे. या आदेशाचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना न्या. मुन्शींनी शिक्षण खात्याला केल्या आहे. दर चार महिन्यांनी परिस्थितीचा आढावा घ्या, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत. मात्र हा आढावा अजूनपर्यंत घेतला की नाही याचाच आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.वास्तविक जानेवारी १९९७ मध्येच राज्य सरकारने शाळांना विद्यार्थ्यांवरचा स्कूल बॅगचा बोजा कमी करण्याची सूचना दिली होती. परिस्थितीची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या समितीला १५ जिल्ह्यांमधील एक हजार ४७५ शाळांमधल्या ९० हजार विद्यार्थ्यांची पाहणी केल्यानंतर आढळले होते की, या मुलांना चार ते १० किलोचे ओझे दप्तराच्या रुपाने पाठीवरुन वाहने लागते. परिणामी पाठदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, चक्कर येणे यासारखे त्रास त्यांना होतात.माजी न्यायाधीश आर. जी. सिंधकर यांना शाळांकडून विद्यार्थ्यांच्या बाबतीतील आदेशाचे पालन होत नाही, असे निदर्शनास आले होते. म्हणून त्यांनी राज्य मानवी अधिकारी आयोगाकडे तक्रार केली होती. तिची दखल घेऊन आयोगाने परिस्थितीची फेरपाहणी करुन आता नव्याने आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून अपेक्षित होती. मात्र तसे झाले नाही. यंदाचे शैक्षणिक सत्र सुरु झाले असून अद्याप या आदेशाचे पालन कोणीच केलेले दिसून येत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन शिक्षण विभागाने हा नियम आणखी कठोर करण्याची गरज असून मराठी शाळांपेक्षा इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे जास्त आहे.