शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे कायम

By admin | Updated: January 11, 2016 00:49 IST

इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे ओझे घ्यावे लागते. त्यामुळे अगदी कमी वयापासून विद्यार्थ्यांच्या शरीरावर ताण सुरु होतो.

आदेशाचे पालन नाही : मार्गदर्शक सूचनांकडे शाळांचे दुर्लक्षआशिष देरकर गडचांदूरइयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे ओझे घ्यावे लागते. त्यामुळे अगदी कमी वयापासून विद्यार्थ्यांच्या शरीरावर ताण सुरु होतो. शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे किती वजनापर्यंत असले पाहिजे, या संदर्भात शालेय शिक्षण खात्याने शाळांकरिता मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवर अवाजवी ताण पडू नये, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार कोणत्याही शाळांनी अजूनपर्यंत केलेला नाही.पहिल्या इयत्तेच्या मुलांना १.७५ किलोपेक्षा जास्त व सातव्या इयत्तेच्या मुलांना ३.७५ किलोपेक्षा जास्त वजनाची बॅग उचलावी लागू नये, असे निर्देश आहेत. मात्र शाळांनी हा नियम अमलात आणला नाही. शाळकरी मुलांना पाठ्यपुस्तकाखेरीज काहीही सोबत घ्यावे लागणार नाही, याची दक्षता शाळेने घ्यायची आहे. गाईड्स, वर्कबुक तसेच कार्यानुभव वह्या यांची ने-आण त्यांना करावी लागू नये, असेही सांगण्यात आले आहे. मानवी अधिकार आयोगाचे सदस्य न्या. व्ही. जी. मुन्शी यांनी या सूचनांचे चोख पालन झाले पाहिजे, असे शाळांना सांगितले असून पालनात चुकारपना करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण खात्याला दिले आहे. या आदेशाचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना न्या. मुन्शींनी शिक्षण खात्याला केल्या आहे. दर चार महिन्यांनी परिस्थितीचा आढावा घ्या, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत. मात्र हा आढावा अजूनपर्यंत घेतला की नाही याचाच आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.वास्तविक जानेवारी १९९७ मध्येच राज्य सरकारने शाळांना विद्यार्थ्यांवरचा स्कूल बॅगचा बोजा कमी करण्याची सूचना दिली होती. परिस्थितीची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या समितीला १५ जिल्ह्यांमधील एक हजार ४७५ शाळांमधल्या ९० हजार विद्यार्थ्यांची पाहणी केल्यानंतर आढळले होते की, या मुलांना चार ते १० किलोचे ओझे दप्तराच्या रुपाने पाठीवरुन वाहने लागते. परिणामी पाठदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, चक्कर येणे यासारखे त्रास त्यांना होतात.माजी न्यायाधीश आर. जी. सिंधकर यांना शाळांकडून विद्यार्थ्यांच्या बाबतीतील आदेशाचे पालन होत नाही, असे निदर्शनास आले होते. म्हणून त्यांनी राज्य मानवी अधिकारी आयोगाकडे तक्रार केली होती. तिची दखल घेऊन आयोगाने परिस्थितीची फेरपाहणी करुन आता नव्याने आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून अपेक्षित होती. मात्र तसे झाले नाही. यंदाचे शैक्षणिक सत्र सुरु झाले असून अद्याप या आदेशाचे पालन कोणीच केलेले दिसून येत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन शिक्षण विभागाने हा नियम आणखी कठोर करण्याची गरज असून मराठी शाळांपेक्षा इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे जास्त आहे.