शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रिदनुसार एसटी धावून गेली आणि पुन्हा आगारात मुक्कामाला आली. एसटी बंद असल्यामुळे विविध घटकांतील प्रवाश्यांना एसटीच्या योजनांपासून मुकावे लागण्याची भीती होती.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये प्रवाशांना दिलासा । वंचित घटकांना आता योजनेचा घेता येणार लाभ

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे आगारात अडकून पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाश्यांना दिलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत प्रवाश्यांचे हित जपले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाखो सामान्य प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रिदनुसार एसटी धावून गेली आणि पुन्हा आगारात मुक्कामाला आली. एसटी बंद असल्यामुळे विविध घटकांतील प्रवाश्यांना एसटीच्या योजनांपासून मुकावे लागण्याची भीती होती. राज्यात एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ घटकांना ३३ टक्क््यांपासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवाश्यांनी आधार क्रमांकाशी लिंक असलेले स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे. लॉकडाऊनपूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती. मात्र २१ मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांना स्मार्टकार्डसाठीची प्रक्रिया या कालावधीत करता आली नाही. यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर या प्रवाश्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्यांना अद्यापही स्मार्ट कार्ड काढता आले नाही त्यांच्यासाठीही ही बाब दिलासादायक आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यांतर्गंत बस सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रवाश्यांचा अत्यल्प प्रतिसाद असला तरी भविष्यात प्रवाशी वाढतील, असा अंदाज महामंडळाने व्यक्त केला आहे.एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच मुदतवाढ दिली होती. लॉकडाऊनमुळे अनेकांना एसटी महामंडळाच्या सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्टकार्ड काढता आले नाही. ही बाब विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने स्मार्टकार्ड काढण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.- आर. एन. पाटील,विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

टॅग्स :state transportएसटी