शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जगण्यासाठी धडपडताना ‘ती’ काळरात्र ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : म्हणतात ना, आयुष्य हे क्षणभंगूर आहे. कोणीही आपल्या आयुष्याची हमी देऊ शकत नाही. दुर्गापुरात घडलेली घटना अशीच ...

चंद्रपूर : म्हणतात ना, आयुष्य हे क्षणभंगूर आहे. कोणीही आपल्या आयुष्याची हमी देऊ शकत नाही. दुर्गापुरात घडलेली घटना अशीच काहीशी आहे. सोमवारची रात्र जगण्यासाठी धडपडणाऱ्या लष्करे कुटुंबासाठी काळरात्र ठरेल, असा विचार कुणीही केला नव्हता. अखेर नियतीने डाव साधलाच.

रमेश लष्करे हे पेटी कंत्राटदार. लहानसहान कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. यामुळे घरची परिस्थिती समाधानकारक होती. घरात आनंदाचे वातावरण. २८ जूनला मोठा मुलगा अजयचा विवाह झाला. नववधू आल्यानंतर घरातला आनंद दि्वगुणीत झाला. पण, या आनंदाला कुणाची नजर लागावी, असेच घडले. अजयची पत्नी माधुरी ही लग्नानंतर माहेरी गेली होती. ती घरात यावी आणि असे घडावे, यात तिचा काय दोष? मोठ्या आनंदात नववधू सोमवारी सासरी आली. हा दिवस तिच्यासाठी पहिला आणि शेवटचा दिवस ठरावा, ही कल्पनाही कोणी करू शकत नाही. मात्र नियतीनेच हा डाव रचला होता.

एखाद्या चित्रपटात घडावे याप्रमाणे घरात सर्वकाही सुरळीत असताना, रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. येथूनच नियतीने आपला खेळ सुरू केला. पावसातच त्या परिसरातील रोहित्रात बिघाड होऊन ते जळाले. थोड्या वेळाने वीज येईल, म्हणून डोळ्यात तेल टाकून लष्करे कुटुंबीय रात्री १२ वाजेपर्यंत वाट बघत होते. पण वीज आलीच नाही. कुटुंबप्रमुख या नात्याने रमेश लष्करे हे अस्वस्थ होते. कुटुंबातील सदस्यांना निवांत झोपलेले पाहून कोणत्याही कुटुंबप्रमुखाला यापेक्षा दुसरा आनंद नसतो आणि घरात नववधू आलेली असताना, तिला अंधारात ठेवणे हे त्यांना खटकणारे होते. त्यामुळे रात्री १२ वाजता त्यांनी अडगळीत पडलेले जनरेटर बाहेर काढले. ते सुरू करण्यासाठी त्यांनी रात्री धडपड करून पेट्रोल आणले. अखेर जनरेटर सुरू झाले. घरातील वीजदिवे प्रकाशमान झाले. पण हा प्रकाशच कुटुंबात कायम अंधार आणणारा ठरला. सर्व कुटुंबीय झोपी गेले. डोळ्यात झोप असल्यामुळे लगेच झोप लागली. अखेर काळाने डाव साधला.

सकाळी लवकर उठणारी ही मंडळी, आज कोणीच कसे नाही उठले? म्हणून शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले. पण आतील जे दृष्य दिसले, ते धक्कादायक होते. कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असल्यागत मृत्युमुखी पडलेले होते. रमेश लष्करे यांची पत्नी दासू यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांना लगेच रुग्णालयात हलविण्यात आले. त्या बेशुद्धावस्थेत होत्या. या घटनेत कुटुंब प्रमुखासह तीन मुले, एक मुलगी आणि मुलाची नववधू यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.