शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

प्लास्टिक बंदीची शहरात कठोर अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:14 IST

शासनाने प्लॉस्टिक व थर्माकोलवर निर्मिती व विक्रीवरही बंदी आणली. यासोबतच कठोर दंड ठोठावण्यात तरतूद केली. या कायद्याची पायमल्ली होऊ नये, यासाठी नगर परिषदच्या वतीने कठोर अंमलबजावणी केली जात आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत व्यावसायिकांकडून घेतले शपथपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शासनाने प्लॉस्टिक व थर्माकोलवर निर्मिती व विक्रीवरही बंदी आणली. यासोबतच कठोर दंड ठोठावण्यात तरतूद केली. या कायद्याची पायमल्ली होऊ नये, यासाठी नगर परिषदच्या वतीने कठोर अंमलबजावणी केली जात आहे.प्लॉस्टिकचा वापर करताना सापडल्यास शिक्षा होते. पहिला गुन्हा करणाऱ्याला ५ हजार, दुसरा गुन्हा गेल्यास १० हजार व तिसरा गुन्हा केल्यास २५ हजाराचा दंड तसेच तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. व्यावसायिकांकडून याबाबतचे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे. शासनाच्या या कायद्याला अनुसरून भद्रावती नगरपालिकेने प्लॉस्टिक व थर्माकोल बंदीची मोहीम हाती घेण्यात आली. येत्या १६ एप्रिलपासून प्लॉस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लॉस्टिक बंदीबाबत प्रबोधन करण्यासाठी न.प. च्या सभागृहात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांना बोलाविण्यात आले होते. होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सभापती सुधीर सातपुते व मुख्याधिकारी विनोद जाधव तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. प्लॉस्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली. व्यावसायिकांनी यावेळी समस्या मांडल्या. प्लॉस्टिक बंदीवर अन्य पर्याय काय, याबाबतही विचारणा त्यांनी केली असता कापडाच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरावे, अशी माहिती नगर परिषदच्या वतीने देण्यात आली. नगरसेवकांपासून तर अन्य ३५ प्रकारच्या अधिकाऱ्यांमार्फत प्लॉस्टिकबाबत कारवाई करण्याचे अधिकार शासनाने दिले आहे. भद्रावती न.प. द्वारे या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सहा पथके तयार करण्यात आहेत. एका पथकात चार कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार असून त्यांच्यासोबत पोलिसांची उपस्थिती राहील. या मोहिमेला शहरातील सर्व व्यापारी व दुकानदारांनी सहकार्य केल्यास प्लॉस्टिक मुक्तीचा संकल्प कृतीत उतरणार आहे.कागदी कपातून घेतला चहाकार्यशाळेत उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना यावेळी पहिल्यांदाच न.प. द्वारे कागदी कपातून चहा देण्यात आला. प्लास्टिकच्या कपाऐवजी कागदी कप वापरण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला होता. यापुढे बॅनरलाही नवीन पर्याय दिला जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.