शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

रूग्णालयातील ४६२ रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २ - १११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १ - १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी लागू केलेल्या आकृतीबंधाला बरेच वर्षे झाले. या कालावधीत जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र शासनाने नवीन आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची पद भरती केली नाही.

ठळक मुद्देजुन्या आकृतीबंधाचा परिणाम : कोरोना व अन्य रूग्ण संख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढत असताना ओपीडीतील अन्य रूग्णांचीही संख्या विस्तारली. जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयांमध्ये तब्बल ४६२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जुन्याच आकृतीबंधावर कर्मचारी भरती कायम असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २ - १११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १ - १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी लागू केलेल्या आकृतीबंधाला बरेच वर्षे झाले. या कालावधीत जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र शासनाने नवीन आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची पद भरती केली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही विस्तार झाला. उपजिल्हा रूग्णालय, ट्रामा केअर युनिट, ग्रामीण रूग्णालयात सुविधांमध्ये वाढ करण्यात आली. परंतु, कर्मचारी भरतीचा आकृतीबंधच अद्याप बदलविण्यात आला नाही. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दररोज २०० ते २५० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. याशिवाय अन्य रूग्णांचीही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा कहर सुरू असतानाही ओपीडीमध्ये उपचार करणाºया अन्य रूग्णांची संख्या वाढली. मात्र, रिक्त पदे ही सर्वात मोठी समस्या झाली आहे.पदभरतीविना अडचणीजिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीसीसी सेंटर वाढविले. प्रशिक्षण देवून बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या केंद्रात करण्यात आल्या. आहेत. अशा परिस्थितीत वर्ग एक-दोन, वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत सरकारने हालचाली केल्या नाही. त्यामुळे रूग्णसेवा देताना कार्यरत कर्मचाºयांवर मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या