शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

समता व बंधुतेचा आवाज बुलंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:43 IST

भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. फॅसिस्ट शक्ती कायदे बदलण्याचे छुपे मनसुबे रचून भारतीय संविधानाला हादरे देऊ लागले आहेत.

अभिजित वैद्य : ‘वाढती असहिष्णुता व सामाजिक भाईचारा’वर व्याख्यानचिमूर : भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. फॅसिस्ट शक्ती कायदे बदलण्याचे छुपे मनसुबे रचून भारतीय संविधानाला हादरे देऊ लागले आहेत. एकूणच देशात मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता समता व बंधुतेचा विचार बुलंद करावा, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी चिमूर येथे केले.समाजवादी नेते भाई रहेमतुल्ला यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘वाढती असहिष्णुता व सामाजिक भाईचारा’ विषयावर आयोजित व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते.यावेळी डॉ. वैद्य यांच्या हस्ते स्व. भाई रहेमतुल्ला यांच्या धर्मपत्नी साबेरा बेगम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी पाटील डाहुले उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रा. नुतन माळवी, कर्नल चंद्रशेखर रानडे, प्रा. युनूस शेख आदी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले की, सध्या राजकारणात व समाजात फॅसिझम वाढत चालला आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची वारंवार घोषणा देऊन काही धर्मांध लोक समाजात अशांतता निर्माण करू पाहत आहे. त्याच वेळी गरिबांसाठी शिक्षण घेणे महाग झाले आहे. समाजात विषमतेची दरी वाढत चालली आहे, असा आरोपही त्यांनी केला.याप्रसंगी प्रा. नुतन माळवी म्हणाल्या की, भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समता दिली आहे. मात्र सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारला मनुस्मृती व गीता ग्रंथ पुढे आणायचा आहे. हे दोन्ही ग्रंथ विषमता निर्माण करणारे असल्यामुळे या विरोधात संघर्ष करणे आवश्यक आहे.प्रारंभी वसंतराव कडू गुरुजी व संचाने मंगेश पाडगांवकर यांचे गीत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची वंदना आणि सिंदेवाही येथील कमल बारसागडे व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत तालुका अध्यक्ष माधुरी वीर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इखलाकभाई कुरेशी यांनी केले. संचालन मुस्तकीम पठाण गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी भाई रहेमतुल्ला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)