शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

समता व बंधुतेचा आवाज बुलंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:43 IST

भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. फॅसिस्ट शक्ती कायदे बदलण्याचे छुपे मनसुबे रचून भारतीय संविधानाला हादरे देऊ लागले आहेत.

अभिजित वैद्य : ‘वाढती असहिष्णुता व सामाजिक भाईचारा’वर व्याख्यानचिमूर : भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. फॅसिस्ट शक्ती कायदे बदलण्याचे छुपे मनसुबे रचून भारतीय संविधानाला हादरे देऊ लागले आहेत. एकूणच देशात मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता समता व बंधुतेचा विचार बुलंद करावा, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी चिमूर येथे केले.समाजवादी नेते भाई रहेमतुल्ला यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘वाढती असहिष्णुता व सामाजिक भाईचारा’ विषयावर आयोजित व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते.यावेळी डॉ. वैद्य यांच्या हस्ते स्व. भाई रहेमतुल्ला यांच्या धर्मपत्नी साबेरा बेगम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी पाटील डाहुले उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रा. नुतन माळवी, कर्नल चंद्रशेखर रानडे, प्रा. युनूस शेख आदी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले की, सध्या राजकारणात व समाजात फॅसिझम वाढत चालला आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची वारंवार घोषणा देऊन काही धर्मांध लोक समाजात अशांतता निर्माण करू पाहत आहे. त्याच वेळी गरिबांसाठी शिक्षण घेणे महाग झाले आहे. समाजात विषमतेची दरी वाढत चालली आहे, असा आरोपही त्यांनी केला.याप्रसंगी प्रा. नुतन माळवी म्हणाल्या की, भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समता दिली आहे. मात्र सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारला मनुस्मृती व गीता ग्रंथ पुढे आणायचा आहे. हे दोन्ही ग्रंथ विषमता निर्माण करणारे असल्यामुळे या विरोधात संघर्ष करणे आवश्यक आहे.प्रारंभी वसंतराव कडू गुरुजी व संचाने मंगेश पाडगांवकर यांचे गीत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची वंदना आणि सिंदेवाही येथील कमल बारसागडे व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत तालुका अध्यक्ष माधुरी वीर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इखलाकभाई कुरेशी यांनी केले. संचालन मुस्तकीम पठाण गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी भाई रहेमतुल्ला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)