शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

जोगपूर-राजुरा वन पर्यटन तत्काळ बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:34 IST

गोवरी : राजुरा शहरापासून जवळच असलेल्या जोगापूर जंगलात वन विभागाने सुरू केलेली जंगल सफारी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास ...

गोवरी : राजुरा शहरापासून जवळच असलेल्या जोगापूर जंगलात वन विभागाने सुरू केलेली जंगल सफारी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. या जंगल सफारीमुळे भविष्यात वन्यप्राणी डुक्कर, हरीण, चितळ, सांबर, जंगलाबाहेर येऊन शेतकऱ्याचे शेतपीक नष्ट करणार आहेत. त्यामुळे जोगापूर वनपर्यटन तत्काळ बंद करा, अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीने केली आहे.

शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत आहेत. वाघ, बिबट, अस्वलही जंगलाबाहेर येणार आहेत. त्यामुळे वन्यजीव व मानव संघर्ष निर्माण होऊन जैव विविधता धोक्यात येईल. याला जबाबदार फक्त आणि फक्त वनविभाग असणार आहे. शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे. जंगलातून वन्याप्राणी शेतामध्ये येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. परिसरातील कुठल्याही नागरिकांची, शेतकऱ्यांची मागणी नसताना हे वनपर्यटन का सुरू करण्यात आले, असा प्रश्न समितीने केला आहे. ज्या गोष्टीला शेतकरी विरोध करीत आहेत, तीच गोष्ट करण्यात वनविभाग असा हट्ट का करीत आहे, वनपर्यटन बंद न केल्यास वनालगतच्या गावातील शेतकरी, शेतमजुरांचा संताप उफाळून रस्त्यावर येईल. त्यामुळे जोगपूर जंगलातील जंगल सफारी तत्काळ बंद करावी, अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बोबडे यांनी केली आहे.