शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

दगडी पाटा, वरवंटा ग्रामीण भागाचा मिक्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो.

ठळक मुद्देकांडलेल्या वस्तुंची चव न्यारी, लॉकडाऊनमुळे पाथरवटांचे नुकसान

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : जुन्या काळात प्रत्येक घरात अत्यावश्यक असलेल्या पाट्याची जागा आता शहरी भागात 'मिक्सर' या आधुनिक उपकरणाने घेतली. मात्र, ग्रामीण भागात अद्याप पाट्याचे अस्तित्व कायम आहे. यातून बऱ्याच कुटुंबांची उपजिविकाही सुरू असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो. तालुक्यातील बाम्हणी येथील काही पाथरवट या पाट्यांची निर्मिती करून ते आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. एका पाट्याची किंमत तीनशे ते सहाशे रूपयांपर्यंत असते. लॉकडाऊनमुळे पारंपरिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथरवटांचा पाटा निर्मिती हा एकमेव नसला तरी यातून कुटुंबाला हातभार मिळतो. एक पाथरवट वर्षाला सुमारे २५ ते ३० हजार रूपये मिळवितो. बाम्हणी येथे असे पाच सहा पाथरवट आहेत. पाट्यावर आजही मसाल्याचे पदार्थ वाटल्या जातात. नागभीड शहर व ग्रामीण भागात तर विविध पदार्थ वाटण्यासाठी पाट्याचाच वापर होतो. शहरातील काही कुटुंब तर मिक्सरपेक्षा पाट्यावर वाटलेल्या जिन्नसांना विशेष पसंती देतात. 'टाचविण्यातूनही मिळतो रोजगारनेहमीच्या वापराने पाट्यावर पदार्थ वाटण्याची प्रक्रिया त्रासदायक असते. त्यामुळे पाट्याला टाचवून घ्यावे लागते. हे काम काही व्यक्ती करतात. यातूनही या पाथरवटांना थोडा रोजगार मिळतो. पाटा टाचवणारे पाथरवट गावागावात फिरून ‘आहे का पाटा टाचवायचा’ अशी हाक देत असतात. पाटा टाचविण्यासाठी ५० ते ६० रूपये असा दर असल्याची माहिती कारागीरांनी दिली.पारंपरिक व्यवसायाची उपेक्षादगडांपासून विविध वस्तु तयार करणाºया जमातींची संख्या बरीच कमी आहे. काळाच्या स्पर्धेत हा व्यवसाय मागे पडल्याने पारंपरिक कारागीर नवीन व्यवसाय स्वीकारत आहेत. यातून केवळ कुटुंबांचा कसाबसा उदरनिर्वाह करता येऊ शकतो. शासनाकडून या व्यवसायाला आर्थिक पाठबळ नाही. महागाई वाढल्याने या अल्प उत्पनातून कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे शासनाने अशा कारागीरांसाठी योजना सुरू करण्याची मागणी पाथरवटांनी केली आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक