शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दगडी पाटा, वरवंटा ग्रामीण भागाचा मिक्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो.

ठळक मुद्देकांडलेल्या वस्तुंची चव न्यारी, लॉकडाऊनमुळे पाथरवटांचे नुकसान

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : जुन्या काळात प्रत्येक घरात अत्यावश्यक असलेल्या पाट्याची जागा आता शहरी भागात 'मिक्सर' या आधुनिक उपकरणाने घेतली. मात्र, ग्रामीण भागात अद्याप पाट्याचे अस्तित्व कायम आहे. यातून बऱ्याच कुटुंबांची उपजिविकाही सुरू असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो. तालुक्यातील बाम्हणी येथील काही पाथरवट या पाट्यांची निर्मिती करून ते आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. एका पाट्याची किंमत तीनशे ते सहाशे रूपयांपर्यंत असते. लॉकडाऊनमुळे पारंपरिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथरवटांचा पाटा निर्मिती हा एकमेव नसला तरी यातून कुटुंबाला हातभार मिळतो. एक पाथरवट वर्षाला सुमारे २५ ते ३० हजार रूपये मिळवितो. बाम्हणी येथे असे पाच सहा पाथरवट आहेत. पाट्यावर आजही मसाल्याचे पदार्थ वाटल्या जातात. नागभीड शहर व ग्रामीण भागात तर विविध पदार्थ वाटण्यासाठी पाट्याचाच वापर होतो. शहरातील काही कुटुंब तर मिक्सरपेक्षा पाट्यावर वाटलेल्या जिन्नसांना विशेष पसंती देतात. 'टाचविण्यातूनही मिळतो रोजगारनेहमीच्या वापराने पाट्यावर पदार्थ वाटण्याची प्रक्रिया त्रासदायक असते. त्यामुळे पाट्याला टाचवून घ्यावे लागते. हे काम काही व्यक्ती करतात. यातूनही या पाथरवटांना थोडा रोजगार मिळतो. पाटा टाचवणारे पाथरवट गावागावात फिरून ‘आहे का पाटा टाचवायचा’ अशी हाक देत असतात. पाटा टाचविण्यासाठी ५० ते ६० रूपये असा दर असल्याची माहिती कारागीरांनी दिली.पारंपरिक व्यवसायाची उपेक्षादगडांपासून विविध वस्तु तयार करणाºया जमातींची संख्या बरीच कमी आहे. काळाच्या स्पर्धेत हा व्यवसाय मागे पडल्याने पारंपरिक कारागीर नवीन व्यवसाय स्वीकारत आहेत. यातून केवळ कुटुंबांचा कसाबसा उदरनिर्वाह करता येऊ शकतो. शासनाकडून या व्यवसायाला आर्थिक पाठबळ नाही. महागाई वाढल्याने या अल्प उत्पनातून कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे शासनाने अशा कारागीरांसाठी योजना सुरू करण्याची मागणी पाथरवटांनी केली आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक