शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

दगडी पाटा, वरवंटा ग्रामीण भागाचा मिक्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो.

ठळक मुद्देकांडलेल्या वस्तुंची चव न्यारी, लॉकडाऊनमुळे पाथरवटांचे नुकसान

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : जुन्या काळात प्रत्येक घरात अत्यावश्यक असलेल्या पाट्याची जागा आता शहरी भागात 'मिक्सर' या आधुनिक उपकरणाने घेतली. मात्र, ग्रामीण भागात अद्याप पाट्याचे अस्तित्व कायम आहे. यातून बऱ्याच कुटुंबांची उपजिविकाही सुरू असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो. तालुक्यातील बाम्हणी येथील काही पाथरवट या पाट्यांची निर्मिती करून ते आठवडी बाजारात विक्रीसाठी आणतात. एका पाट्याची किंमत तीनशे ते सहाशे रूपयांपर्यंत असते. लॉकडाऊनमुळे पारंपरिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथरवटांचा पाटा निर्मिती हा एकमेव नसला तरी यातून कुटुंबाला हातभार मिळतो. एक पाथरवट वर्षाला सुमारे २५ ते ३० हजार रूपये मिळवितो. बाम्हणी येथे असे पाच सहा पाथरवट आहेत. पाट्यावर आजही मसाल्याचे पदार्थ वाटल्या जातात. नागभीड शहर व ग्रामीण भागात तर विविध पदार्थ वाटण्यासाठी पाट्याचाच वापर होतो. शहरातील काही कुटुंब तर मिक्सरपेक्षा पाट्यावर वाटलेल्या जिन्नसांना विशेष पसंती देतात. 'टाचविण्यातूनही मिळतो रोजगारनेहमीच्या वापराने पाट्यावर पदार्थ वाटण्याची प्रक्रिया त्रासदायक असते. त्यामुळे पाट्याला टाचवून घ्यावे लागते. हे काम काही व्यक्ती करतात. यातूनही या पाथरवटांना थोडा रोजगार मिळतो. पाटा टाचवणारे पाथरवट गावागावात फिरून ‘आहे का पाटा टाचवायचा’ अशी हाक देत असतात. पाटा टाचविण्यासाठी ५० ते ६० रूपये असा दर असल्याची माहिती कारागीरांनी दिली.पारंपरिक व्यवसायाची उपेक्षादगडांपासून विविध वस्तु तयार करणाºया जमातींची संख्या बरीच कमी आहे. काळाच्या स्पर्धेत हा व्यवसाय मागे पडल्याने पारंपरिक कारागीर नवीन व्यवसाय स्वीकारत आहेत. यातून केवळ कुटुंबांचा कसाबसा उदरनिर्वाह करता येऊ शकतो. शासनाकडून या व्यवसायाला आर्थिक पाठबळ नाही. महागाई वाढल्याने या अल्प उत्पनातून कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे शासनाने अशा कारागीरांसाठी योजना सुरू करण्याची मागणी पाथरवटांनी केली आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक