शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

भाजीबाजारातील कचऱ्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

भद्रावती तालुक्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक जोरात भद्रावती : तालुक्याला जोडणाऱ्या विविध मार्गांवर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू ...

भद्रावती तालुक्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक जोरात

भद्रावती : तालुक्याला जोडणाऱ्या विविध मार्गांवर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. या मार्गांवरील वृक्षांवर रेडियम पट्टी नाही. मात्र, प्रवाशांची काळजी न घेता चालक मनमर्जीने वाहन दामटवतात. त्यामुळे या रस्त्यांवरील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

गडचांदूर - पांढरकवडा बसअभावी प्रवाशांची ताटकळ

गडचांदूर : येथून कोरपना, आदिलाबादमार्गे पांढरकवडा शहरासाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. गडचांदूर हे शहर सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथून अनेक भागात जाण्यासाठी बससेवा आहे. मात्र, पांढरकवडासाठी थेट बससेवा नाही. तसेच आदिलाबाद हा कमी अंतराचा मार्ग असल्याने या मार्गावर बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे.

तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम

चिमूर : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

माणिकगड परिसराचा इतिहास उपेक्षित

जिवती : राजुरा, जिवती, कोरपना तालुक्यात असलेला माणिकगड पहाड हौशी ट्रेकर्ससाठी अद्भूत पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यातील सात बहिणींचा डोंगर पहाडाचा विकास साधल्यास पर्यटनदृष्ट्या विकासाला चालना मिळू शकते. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे माणिकगड परिसराचा इतिहास अजूनही उपेक्षित आहे.

पीक विमासाठी माहिती केंद्र सुरू करा

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, घुग्घुस, कोठारी, विसापूर, भिसी, तळोधी, बाळापूर येथील पीक विम्याची अनेक प्रकरणी प्रलंबित आहेत. मोबदला अजूनही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. माहितीच मिळत नसल्याने तालुकास्थळी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

ठाण्यातील वाहनांचा लिलाव रखडला

चंद्रपूर : येथील शहर व रामनगर पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र, वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेलीच नाहीत. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहेत. त्यातील अनेक वाहने भंगार झाली. काहींचे सुटे भागही बेपत्ता आहेत. या वाहनांचा लिलाव केल्यास शासनाच्या महसुलात भर पडू शकते. दरवर्षी न्यायालयाच्या आदेशाने या वाहनांचा लिलाव होतो. मात्र, अजूनही लिलाव करण्यात आला नाही.

जिल्ह्यातील शिवभोजनाचे केंद्र वाढावे

चंद्रपूर : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत. मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे. शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांग लागते.

प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून, प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

बचत गटांना कर्जपुरवठा करण्याची मागणी

राजुरा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिणाम झाला आहे. यामध्ये बचत गटांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांनी कर्जपुरवठा करून त्यांना जीवनदान देणे सध्यातरी गरजेचे आहे.

अनियमित पाणीपुरवठ्याने त्रस्त

चंद्रपूर : येथील बाबूपेठ परिसरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.