शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजारातील कचऱ्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

भद्रावती तालुक्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक जोरात भद्रावती : तालुक्याला जोडणाऱ्या विविध मार्गांवर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू ...

भद्रावती तालुक्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक जोरात

भद्रावती : तालुक्याला जोडणाऱ्या विविध मार्गांवर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. या मार्गांवरील वृक्षांवर रेडियम पट्टी नाही. मात्र, प्रवाशांची काळजी न घेता चालक मनमर्जीने वाहन दामटवतात. त्यामुळे या रस्त्यांवरील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

गडचांदूर - पांढरकवडा बसअभावी प्रवाशांची ताटकळ

गडचांदूर : येथून कोरपना, आदिलाबादमार्गे पांढरकवडा शहरासाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. गडचांदूर हे शहर सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथून अनेक भागात जाण्यासाठी बससेवा आहे. मात्र, पांढरकवडासाठी थेट बससेवा नाही. तसेच आदिलाबाद हा कमी अंतराचा मार्ग असल्याने या मार्गावर बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे.

तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम

चिमूर : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

माणिकगड परिसराचा इतिहास उपेक्षित

जिवती : राजुरा, जिवती, कोरपना तालुक्यात असलेला माणिकगड पहाड हौशी ट्रेकर्ससाठी अद्भूत पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यातील सात बहिणींचा डोंगर पहाडाचा विकास साधल्यास पर्यटनदृष्ट्या विकासाला चालना मिळू शकते. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे माणिकगड परिसराचा इतिहास अजूनही उपेक्षित आहे.

पीक विमासाठी माहिती केंद्र सुरू करा

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, घुग्घुस, कोठारी, विसापूर, भिसी, तळोधी, बाळापूर येथील पीक विम्याची अनेक प्रकरणी प्रलंबित आहेत. मोबदला अजूनही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. माहितीच मिळत नसल्याने तालुकास्थळी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

ठाण्यातील वाहनांचा लिलाव रखडला

चंद्रपूर : येथील शहर व रामनगर पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र, वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेलीच नाहीत. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहेत. त्यातील अनेक वाहने भंगार झाली. काहींचे सुटे भागही बेपत्ता आहेत. या वाहनांचा लिलाव केल्यास शासनाच्या महसुलात भर पडू शकते. दरवर्षी न्यायालयाच्या आदेशाने या वाहनांचा लिलाव होतो. मात्र, अजूनही लिलाव करण्यात आला नाही.

जिल्ह्यातील शिवभोजनाचे केंद्र वाढावे

चंद्रपूर : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत. मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे. शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांग लागते.

प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून, प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

बचत गटांना कर्जपुरवठा करण्याची मागणी

राजुरा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिणाम झाला आहे. यामध्ये बचत गटांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांनी कर्जपुरवठा करून त्यांना जीवनदान देणे सध्यातरी गरजेचे आहे.

अनियमित पाणीपुरवठ्याने त्रस्त

चंद्रपूर : येथील बाबूपेठ परिसरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.