शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

वन कामगारांची अवस्था अनाथांसारखी

By admin | Updated: May 10, 2017 00:51 IST

ज्यांना आई - वडिलांचा पत्ता नाही. ज्यांना जात नाही. स्वत:चे आडनावदेखील माहिती नाही, अशा अनाथ मुलांना अनाथ आश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो.

रमेश दहिवडे : विदर्भ वन कामगार संघटनेचा मेळावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्यांना आई - वडिलांचा पत्ता नाही. ज्यांना जात नाही. स्वत:चे आडनावदेखील माहिती नाही, अशा अनाथ मुलांना अनाथ आश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. त्यांच्या निवास, जेवणाची व्यवस्था अनाथ आश्रमाच्या वतीने केली जाते. तरीही या मुलामुुलींना १८ वर्ष पूर्ण होताच अनाथ आश्रमातून काढून टाकले जाते. स्वत:ची काही ओळख नाही, खिशात रुपया नाही, अशा अवस्थेत त्यांना कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. याच अवस्थेत आज वन कामगारांनाही जगावे लागत आहे, अशी टीका विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.वन कामगारांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. दहिवडे म्हणाले की, काम असताना ९० दिवस पूर्ण झाल्याच्या नावाखाली रोजंदारी वन कामगारांना कामावरुन कमी केले जाते. तेव्हा या वन कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचे काय, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. १२ महिने कामावर राहणारे वन अधिकारी शासनाचा आदेश आहे, असे निर्लज्जपणे सांगून नवीन कामगारांना घेतात. रोजंदारी कामगारांची बाजू उचलून धरणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यापूर्वी दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याकडे लक्ष देतील व वन कामगारांना अनाथ कामगाराप्रमाणे नव्हे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देतील, अशी अपेक्षा प्रा. दहिवडे यांनी व्यक्त केली आहे.