शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

एसटी वर्कर्सचे विभाग नियंत्रकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 01:08 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तसेच हजारो कोटी रुपये तोट्यात असलेल्या एमएसईबीमधील कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात आलेली आहे. एसटी कामगारांना एमएसईबीप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे विभागीय अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष विजय बोरगमवार यांच्या नेतृत्वात विभागीय नियंत्रक महेंद्र भैसारे यांना निवेदन देऊन करण्यात आली.निवेदनात प्रामुख्याने औद्योगिक कलह अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा. २००० ते २०१२ पर्यंत ज्या कामगारांना कनिष्ठ वेतनश्रेणीत तीन वर्षापेक्षा जास्त व पाच वर्ष अथवा अधिक सेवा पूर्ण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांचे ज्यावेळी तीन वर्ष सेवा पूर्ण झाली आहे, त्यावेळी नियमित वेनतश्रेणी देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी. १ एप्रिल २०१२ नंतर कनिष्ठ वेतनश्रेणी नियमित वेतनश्रेणीत येताना १३ टक्के कराराचा फायदा देण्यात आलेला नाही. अशा कर्मचाऱ्यांना कराराचा १३ टक्के फायदा देऊन वेतन निश्चित करावे. चालक- वाहक यांच्या ड्युटी एलोकेशन टी- रोटेशनची अंमलबजावणी करण्यात यावी. महिलांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सोयी प्रदान करण्यात याव्या. अप्रेंटिस उमेदवारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे विद्यावेतन तत्काळ अदा करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे विभागीय अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष विजय दोरगमवार यांच्या नेतृत्वात विभाग नियंत्रक महेंद्र भैसारे यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात विभागीय सचिव शकील अहमद, कोषाध्यक्ष अशफाक आगार अध्यक्ष नौशाद आगार, सचिव अकरम खान, विभागीय कार्याध्यक्ष अयुब खान उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)