शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मत्स्यपालन, सिंगाडा उत्पादनासाठी हवे राज्य शासनाचे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:33 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात.

ठळक मुद्देमत्स्यपालन संस्थाची मागणी : लोप पावत असलेल्या व्यवसायाला गती द्यावी

आॅनलाईन लोकमतसास्ती : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. यातूनच त्यांच्या कुटुंंबीयांचा उदरनिर्वाह होते. परंतु, या व्यवसायाकरिता त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता त्यांना मोठ्या निधीची आवश्यकता पडत असून शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेले तलाव पंचायत समितीच्या मार्फतीने मत्स्यपालन व सिंगाडा शेती व्यवसायाकरिता लिजवर मत्स्यपालन सहकारी संस्थांना दिले जाते. परंतु, अशा तलावात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या इकोर्निया सदृष्य वनस्पती व गावातील कचºयामुळे मत्स्यपालन किंवा सिंगाडा शेती व्यवसाय करणे अवघड होते. त्याकरिता तलावाची स्वच्छता करणे गरजेचे असते.उत्पादनाचे स्वप्न रंगविणाºया या मच्छिमार संस्थांना रखरखत्या उन्हात तलाव स्वच्छ करण्याकरिता घाम गाळावा लागतो. यात मोठी मेहनत व आर्थिक फटका बसतो. राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेला मोठा तलाव आहे.सदर तलाव पंचायत समितीच्या माध्यमातून मत्स्यपालन व सिंगाडा शेती व्यवसायाकरिता दरवर्षी सहकारी संस्थांना दिला जातो. राजुरा येथील मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था १९६१ पासून दरवर्षी हा तलाव घेवून त्यात व्यवसाय करतात.मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेत तिनशेहून अधिक सदस्य आहेत. त्यातील काही सदस्य हे तलाव घेवून सिंगाडा शेती व मत्स्यपालन करतात. परंतु, याकरिता तलाव स्वच्छ करणे गरजेचे असते. तसेच सिंगाडा लागवड करण्याकरिता व मत्स्यपालनाच्या बिजाई करिता त्यांना निधीची आवश्यकता असते. त्यामुळे तलावाची स्वच्छता करून दिली पाहिजे व बिजाईकरिता आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कार्लेकर, छबन पचारे, मारोती कार्लेकर, अशोक कार्लेकर, घनश्याम कार्लेकर आदींनी केली आहे. याची शासनाने तत्काळ दखल घेण्याची मागणी आहे.मत्स्यपालन व सिंगाडा शेती करण्याकरिता मच्छिमार बांधव मोठी मेहनत घेतात. परंतु, शेतकºयांप्रमाणेच आमच्याही पदरात काही येण्याआधीच संकटाची मालिका सुरू होते. सध्या एक नवे संकट उभे टाकले आहे. ते म्हणजे तलावात वाढलेली वनस्पती व कचरा. या वनस्पतीमुळे उत्पादन तर सोडाच, सिंगाडा लागवड करणेही कठीण होत आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमार बांधवांना सिंगाडा शेतीसाठी व मत्स्यपालनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.- सर्वानंद वाघमारे, उपसरपंच, बामनवाडा