शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

मत्स्यपालन, सिंगाडा उत्पादनासाठी हवे राज्य शासनाचे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:33 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात.

ठळक मुद्देमत्स्यपालन संस्थाची मागणी : लोप पावत असलेल्या व्यवसायाला गती द्यावी

आॅनलाईन लोकमतसास्ती : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. यातूनच त्यांच्या कुटुंंबीयांचा उदरनिर्वाह होते. परंतु, या व्यवसायाकरिता त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता त्यांना मोठ्या निधीची आवश्यकता पडत असून शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेले तलाव पंचायत समितीच्या मार्फतीने मत्स्यपालन व सिंगाडा शेती व्यवसायाकरिता लिजवर मत्स्यपालन सहकारी संस्थांना दिले जाते. परंतु, अशा तलावात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या इकोर्निया सदृष्य वनस्पती व गावातील कचºयामुळे मत्स्यपालन किंवा सिंगाडा शेती व्यवसाय करणे अवघड होते. त्याकरिता तलावाची स्वच्छता करणे गरजेचे असते.उत्पादनाचे स्वप्न रंगविणाºया या मच्छिमार संस्थांना रखरखत्या उन्हात तलाव स्वच्छ करण्याकरिता घाम गाळावा लागतो. यात मोठी मेहनत व आर्थिक फटका बसतो. राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेला मोठा तलाव आहे.सदर तलाव पंचायत समितीच्या माध्यमातून मत्स्यपालन व सिंगाडा शेती व्यवसायाकरिता दरवर्षी सहकारी संस्थांना दिला जातो. राजुरा येथील मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था १९६१ पासून दरवर्षी हा तलाव घेवून त्यात व्यवसाय करतात.मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेत तिनशेहून अधिक सदस्य आहेत. त्यातील काही सदस्य हे तलाव घेवून सिंगाडा शेती व मत्स्यपालन करतात. परंतु, याकरिता तलाव स्वच्छ करणे गरजेचे असते. तसेच सिंगाडा लागवड करण्याकरिता व मत्स्यपालनाच्या बिजाई करिता त्यांना निधीची आवश्यकता असते. त्यामुळे तलावाची स्वच्छता करून दिली पाहिजे व बिजाईकरिता आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कार्लेकर, छबन पचारे, मारोती कार्लेकर, अशोक कार्लेकर, घनश्याम कार्लेकर आदींनी केली आहे. याची शासनाने तत्काळ दखल घेण्याची मागणी आहे.मत्स्यपालन व सिंगाडा शेती करण्याकरिता मच्छिमार बांधव मोठी मेहनत घेतात. परंतु, शेतकºयांप्रमाणेच आमच्याही पदरात काही येण्याआधीच संकटाची मालिका सुरू होते. सध्या एक नवे संकट उभे टाकले आहे. ते म्हणजे तलावात वाढलेली वनस्पती व कचरा. या वनस्पतीमुळे उत्पादन तर सोडाच, सिंगाडा लागवड करणेही कठीण होत आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमार बांधवांना सिंगाडा शेतीसाठी व मत्स्यपालनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.- सर्वानंद वाघमारे, उपसरपंच, बामनवाडा