शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

शेतकऱ्यांप्रति राज्य शासन उदासीन

By admin | Updated: March 21, 2017 00:38 IST

सन २०१५-२०१६ या वर्षात वाढत्या कर्जाला त्रस्त होऊन एकुण आठ हजार ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घोषणा केंद्र सरकार ने केली.

विजय वडेट्टीवार यांचा आरोप : पत्रकार परिषदेत दिली माहितीचंद्रपूर : सन २०१५-२०१६ या वर्षात वाढत्या कर्जाला त्रस्त होऊन एकुण आठ हजार ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घोषणा केंद्र सरकार ने केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला स्वत: केंद्र सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे राज्यात आत्महत्येच्या घटनेत वाढ होत आहे. शनिवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठल्याहीप्रकारची योजना करण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अजुनही रेंगाळत आहे, अशी माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी विश्रामभवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.यावेळी वडेट्टीवार पुढे म्हणाले, मोदी सरकारे ने निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांनीसुद्धा अनेक आश्वासने शेतकऱ्यांना दिली. परंतु निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर सत्ताधारीना या सर्व बाबींचा विसर पडला. अर्थसंकल्पात नवीन नवीन योजनेची घोषणा करण्यात येत आहे. विदेशातून कर्ज घेऊन मेट्रो तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविण्याचा प्रस्ताव प्रारित करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारजवळ काहीच नाही.सत्तेवर येऊन बीजेपी सरकारला अडीच वर्षाचा कालखंड लोटला. परंतु कुठलाही विकास झाला नाही. कुपोषणाच्या संख्येत वाढ झाली. अनेक रुग्णालयात डॉक्टराची पदे रिक्त आहेत. मेडिकल कॉलेजचा कंत्राट पास झालेला नाही. ज्याठिकाणी पैशाची कमतरता आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे अतिरिक्त खर्च करण्यात येत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मागील १५ वर्षात जेवढा खर्च झाला नाही. तेवढा खर्च अडीच वर्षात झाला आहे. असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार सुभाष धोटे, शिवाराव, मेंढे, दादा पाटील, रामू तिवारी, संतोष लहामगे आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांंच्या मार्गदर्शनात मनपा निवडणूक लढणारकाँग्रेस पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात काँग्रेस मनपाची निवडणुक लढवणार. गुणवंता यादीच्या आधाराव कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. पक्षाने तिकीट वाटण्याचे अधिकार कुणालाही देण्यात आले नाही. तिकीट वाटण्याचा अधिकार प्रदेशअध्यक्षाचा आहे.