शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींविषयी राज्य शासन उदासीन

By admin | Updated: June 28, 2014 23:30 IST

ओबीसी आरक्षणाविषयी राज्य शासनाने वेळकाढू धोरण स्विकारले आहे. त्यामुळे आजपर्यंत आश्वासन देऊन केवळ तोंडाला पाने पुसली आहे. याला विदर्भातील ओबीसी समाजाचे मंत्री व लोकप्रतिनिधींची उदासीनता

चंद्रपूर : ओबीसी आरक्षणाविषयी राज्य शासनाने वेळकाढू धोरण स्विकारले आहे. त्यामुळे आजपर्यंत आश्वासन देऊन केवळ तोंडाला पाने पुसली आहे. याला विदर्भातील ओबीसी समाजाचे मंत्री व लोकप्रतिनिधींची उदासीनता तितकीच कारणीभूत आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री व सरकारच्या विरोधात तिव्र भूमिका घेण्याचा इशारा ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर यांनी दिला.भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४० नुसार ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे घटनात्मक दर्जा मिळाला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनात ओबीसींना नोकरी, शिक्षण व राजकीय आरक्षण मिळत आहे. त्यातून ओबीसींचा घटनात्मक दर्जा सिद्ध झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्वाड्यात मान्यता दिली आहे.ओबीसी कृती समितीच्या माध्यमातून सतत मागण्यांचा रेटा सुरू आहे. जसे १९३१ पासून न झालेली ओबीसी समाजाची जनगणना करणे, महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाने ओबीसी शिष्यवृत्तीबद्दल ३१ आॅगस्ट २०१३ चे परिपत्रक रद्द करणे या मागण्यांसाठी अनेक निवेदन, रास्ता रोको, प्रतिनिधीच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. मात्र, शासनाने लक्ष दिले नाही. आता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पत्रपरिषदेला बबन फड, हिराचंद बोरकुटे, दिनेश चोखारे, नगरसेवक राहुल पावडे, राहुल बेले, बबन वानखेडे, राजेंद्र खांडेकर आदींची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)