शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST

चंद्रपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी २ ...

चंद्रपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने तयार केलेले तीन कृषी कायदे जुलमी असल्याचा आरोप करून रद्द करण्याची मागणीही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यामार्फत पंतप्रधानांकडे निवेदनातून केली आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमेवरील दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने चर्चेच्या नऊ फेऱ्यांमध्ये तीन कृषी कायद्यांबाबत कोणतीही तडजोड केली. शेतकरी समस्या सोडविण्यासाठी समाधानकारक ठोस भूमिका घेतली नाही. समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण समाज घटकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करून एकजुटीचे दर्शन घडविणे गरजेचे होते. त्यामुळे अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार शेतकरीबांधवांप्रति बांधिलकी दर्शविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे व अध्यक्ष दीपक जेऊरकर यांनी केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे आणि देशातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबत विचार मांडलेे.

कर्मचारी कृषी कायद्याविरुद्ध एकवटले

महसूल, बांधकाम, पाटबंधारे, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तू व सेवा कर , भूमिअभिलेख, कृषी, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, भूविज्ञान-खनिकर्म, हिवताप कर्मचारी, आरोग्य विभाग आदी विभागाचे कर्मचारी तसेच राजू धांडे, राजेश पिंपळकर, एस. आर. माणूसमारे, गणेश मानकर, महेश पानसे, अतुल भिसे, शैलेंद्र धात्रक, चंद्रकांत कोतपल्लीवार, राजेश पचारे, रवींद्र आमवार, अजय चहारे, श्रीकांत येवले, नितीन पाटील, अनंत गहुकर, अविनाश बोरगमवार, प्रीतम शुक्ला, संदीप गणफाडे आदींसह विविध कार्यालयीन संघटनांनी आंदोलनात सहभाग दर्शविला होता.