शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

चांदाफोर्ट ते हावडापर्यंत सरळ रेल्वेसेवा सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:09 IST

जिल्ह्यातून हावडा (प. बंगाल) येथे जाण्यासाठी ट्रेन नसल्याने बंगाली भाषिकासह अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर ते हावडा येथे सरळ जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व बंगाली समाज एकत्र येत बंगाली कॅम्प चौकात सेवानिवृत्त अधिकारी बिरेंद्रनाथ बिश्वास यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.

ठळक मुद्देबंगाली समाजाची मागणी : बंगाली कॅम्प चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातून हावडा (प. बंगाल) येथे जाण्यासाठी ट्रेन नसल्याने बंगाली भाषिकासह अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर ते हावडा येथे सरळ जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व बंगाली समाज एकत्र येत बंगाली कॅम्प चौकात सेवानिवृत्त अधिकारी बिरेंद्रनाथ बिश्वास यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.चांदाफोर्टवरून बिलासपूरला एकमात्र रेल्वे सुरू आहे. एकच रेल्वेगाडी असल्याने ती खचाखच भरुन जाते. परिणामी अनेक प्रवाश्यांना उभे राहण्यासाठीसुध्दा जागा उपलब्ध नसते. त्यामुळे या रेल्वेला हावडापर्यंत सुरू करावी, किंवा सरळ हावडासाठी नवीन ट्रेन सुरु करावी, तेव्हाच बंगाली समाजाला तसेच इतरांना सोईस्कर होईल. यासंदर्भात समाजातील शिष्टमंडळानी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, डीआरएम नागपूर आदींना मागील एका वर्षांपूवी निवेदन चांदाफोर्ट ते हावडापर्यंत रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले होते. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी समाजबांधवानी एकत्र येऊन आंदोलन केले.यावेळी बी. एन. बिश्वास, जि. के. बिश्वास, बापी दत्ता, विवेक करमरकर, सतीष शहा, अमल बजाज, विकास बारई, प्रशांत राय, छाया सरकार, विनोद सरकार, डॉ. चयन बिश्वास, डॉ. सविता बिश्वास, स्वप्न नाग, उत्तम बिश्वास, उत्तम देवनाथ, दिलीप शाहा, प्रणब घरामी, अशोक शाहा, कृष्णकांत शाहा, संतोष देवनाथ आदी उपस्थित होते.नागपूर गोंदिया हा पर्याय- बिस्वासचंद्रपूर, गडचिरोली आणि कागजनगरमध्ये हजारोच्या संख्येने बंगाली समाज वास्तव्यास आहे. या सर्वांचे मूळस्थान बंगाल असल्याने त्यांना वारंवार येणे - जाणे करावे लगाते. परिवार, व्यवसायाकरिता बंगाली समाज पश्विम बंगालमध्ये जात असतो. त्यासाठी कलकत्तापर्यंत जाण्यासाठी नागपूर आणि गोंदिया रेल्वेने प्रवास करावा लागतो. अशातच आरक्षण न मिळाल्यास बंगाली समाजाला शारीरिक, मानसिक व आर्थिक परिस्थितीचा सामाना करावा लागत असल्याचे बिस्वास यांनी म्हटले आहे.