शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

प्रकल्पग्रस्तांचे खाण बंद आंदोलन प्रारंभ

By admin | Updated: May 14, 2017 00:30 IST

स्थानिक माजरी येथील नागलोन ओ.सी.-२ कोळसा खाण शनिवारपासून बंद पाडण्यात आली आहे.

माजरी वेकोलि : १५ हजार टन कोळशाचे उत्पादन ठप्पराजेश रेवते । लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : स्थानिक माजरी येथील नागलोन ओ.सी.-२ कोळसा खाण शनिवारपासून बंद पाडण्यात आली आहे. नागलोन, पळसगाव, माजरी, पाटाळा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी सहकुटुंब आंदोलनात उतरले आहेत. जोपर्यंत नोकरीचे आदेश देण्यात येणार नाही, तोपर्यंत खाण सुरू होणार नाही, असा इशारा दिला आहे.जून-२०१५ मध्ये वेकोलिने माजरी, पळसगाव, नागलोन व पाटाळा येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नागलोन ओ.सी.-२ येथे कोळसा उत्पादन सुरू केले. दोन वर्षे होऊनही आतापर्यंत नोकरी न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महिला व लहान मुलांसह तिसऱ्यांदा ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी १ ते १० मार्चपर्यंत १० दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी १०२ प्रकल्पग्रस्तांपैकी २८ जणांना नोकरीत समावून घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बैठक घेवून उर्वरित ७८ प्रकल्पग्रस्तांना ३० एप्रिलपर्यंत नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु आज १३ दिवस उलटले तरी त्यांना नोकरी मिळाली नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा ५ मे रोजी चंद्रपूर येथे बैठक बोलावून वेकोलि अधिकाऱ्यांना फटकारले. परंतु वेकोली अधिकारी जिल्हाधिकारीच्या आदेशालासुद्धा मानायला तयार नाही. म्हणून प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी शनिवारपासून पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंद आंदोलनामुळे वेकोलिचे १५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले आहे. त्यातून ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.या आंदोलनात लिलेश ढवस, रवींद्र ढवस, संदीप झाडे, गजानन पारशिवे, रामू डोंगे, अनिल ताजने, गोकुल डोंगे, अविनाश ढवस, वासुदेव डंभारे, देविदास मशारकर, गिता ढवस, माया ढवस, विमल डोंगे, कलावती डंभारे, रंजीता झाडे, मंगला निमकर, कल्पना ढवस, शशीकला झाडे, सुनिता ढोक, मनिषा डोंगे, मीरा ढवस आंदोलनात सहभागी आहेत.काम बंदमुळे परिणामप्रकल्पग्रस्तांचे काम बंद आंदोलनामुळे पावसाळ्यापूर्वीच काम ठप्प झाले आहे. कोराडी नाला हा डायर्व्हशन केला आहे. परंतु ते काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात जवळच्या गावात पुरामुळे गावात पाणी शिरू शकते, अशी शक्यता आहे. तसेच काम बंद आंदोलनामुळे कोळशाच्या साठ्याला आग लागू शकते. त्यातून चंद्रपूर वीज केंद्रात कोळसा पुरवठा होणार नाही.एक महिन्याचा वेळ हवावेकोलि माजरीचे महाप्रबंधक एम. येलय्या यांनी प्रकल्पग्रस्तांना पत्र देवून काम बंद न पाडण्याचे आवाहन केले आहे. एक महिन्याचा वेळ द्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. परंतू प्रकल्पग्रस्त शेतकरी आता कोणत्याही प्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही. नोकरीचे आदेश मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील, असे मत व्यक्त केले.