शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शेतपीक, फळे व भाजीपाला महोत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: May 23, 2014 23:47 IST

शेतकर्‍यांच्या धान्याला भाव मिळावा व शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा, याकरिता अशा प्रकारचे प्रदर्शन व संमेलन दरवर्षी आयोजित करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल,

चंद्रपूर: शेतकर्‍यांच्या धान्याला भाव मिळावा व शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा, याकरिता अशा प्रकारचे प्रदर्शन व संमेलन दरवर्षी आयोजित करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याची मत पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. आज शुक्रवारी चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित कृषी प्रदर्शन व धान्य खरेदी-विक्री संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, कृषी सभापती अरुण निमजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव व आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर उपस्थित होत्या. डॉ. दीकप म्हैसेकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होण्यासाठी एखादे ब्राँड कृषी विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात येऊन त्या ब्राँडला चांगली बाजारपेठ निर्माण करणे व त्या मालामुळे शेतकर्‍यांना जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. या धान्य महोत्सवात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ग्रामीण भागातून आणलेले धान्य, फळे व चांगल्या प्रतीचा भाजीपाला तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे १०० स्टॉल लावण्यात आले आहे. प्रदर्शनाचा चंद्रपूरच्या नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. डी.एल. जाधव यांनी केले. प्रास्ताविक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)