शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे साखळी उपोषण प्रारंभ

By admin | Updated: May 23, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदने, चर्चा, आंदोलने करून पाठपुरावा केला.

विविध समस्या : संघटना समन्वय समितीचे आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदने, चर्चा, आंदोलने करून पाठपुरावा केला. तरीही अद्याप समस्या जैसे थे आहेत करिता सर्व संघटनांनी समन्वय समितीची स्थापना करीत जिल्हा परिषद चंद्रपूर समोर २२ ते २६ मेपर्यंत आयोजित साखळी उपोषण सोमवारपासून सुरू केले आहे.मागील वर्षभरापासून प्राथमिक शिक्षकांची विषय शिक्षक पदस्थापना प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील इयत्ता आठवीचे वर्ग तुटत आहेत, शिक्षक विनाकारण अतिरिक्त होत आहेत, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांचे समायोजन रखडले आहे. वर्षभरापासून ७७२ शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित आहेत, अवघड क्षेत्र निवडतांना अनेक तालुक्यात अन्याय झाला आहे, पंचायत समितीने सुचविलेली पात्र गावे घेण्यात आलेले नाहीत, जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी ३१ मे अंतिम तारीख असताना अद्याप काहीच हालचाल करण्यात आली नाही. यासह शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.याविरोधात कृती समितीने सर्वप्रथम ३० डिसेंबरला निवेदन दिले त्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने २४ एप्रिलला व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २८ एप्रिलला जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये प्रशासनाने सर्व समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता मे महिना उलटत चालला आहे. तरीही कोणतीही समस्या निकाली काढण्यात आलेली नाही. त्याकरिता जिल्ह्यातील १७ शिक्षक व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत समन्वय समितीची स्थापना केली व सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली.पहिल्या दिवशी कैलास म्हस्के, चंद्रकांत पांडे, दीपक वर्हेकर, गणपत विधाते, संजय लांडे, साईबाबा इंदूरवार, आदेश वंजारी, मोरेश्वर बोन्डे, कालिदास वाळके, सुनील ढोके, अनिल आवळे, दुष्यांत निमकर, सुनील दुधे आदी शिक्षकांनी उपोषण केले. याप्रमाणे २६ मेपर्यंत दररोज प्रत्येक संघटनेचे दोन प्रतिनिधी उपोषण करणार आहेत.साखळी उपोषणाचे नेतृत्व निमंत्रक विजय भोगेकर, सहनिमंत्रक मुकुंदा जोगी, कोषाध्यक्ष राजू लांजेकर, सहकोषाध्यक्ष अलका ठाकरे यांचेसह सदस्य ओमदास तुरानकर, उमाजी कोडापे, विलास बोबडे, संजय पडोळे, हरीश ससनकर, सुनील उईके, बंडू डाखरे, राजकुमार वेल्हेकर, नागेश सुखदेवे, रवींद्र उरकुडे, कविता गेडाम, नगाजी साळवे, गोसाई धोटे, राजू दर्वे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. साखळी उपोषणाला केंद्रप्रमुख संघटनेचे रामराव हरडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच पहिल्या दिवशी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी आंदोलन मंडपाला भेट दिली.