शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शिक्षकांचे साखळी उपोषण प्रारंभ

By admin | Updated: May 23, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदने, चर्चा, आंदोलने करून पाठपुरावा केला.

विविध समस्या : संघटना समन्वय समितीचे आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदने, चर्चा, आंदोलने करून पाठपुरावा केला. तरीही अद्याप समस्या जैसे थे आहेत करिता सर्व संघटनांनी समन्वय समितीची स्थापना करीत जिल्हा परिषद चंद्रपूर समोर २२ ते २६ मेपर्यंत आयोजित साखळी उपोषण सोमवारपासून सुरू केले आहे.मागील वर्षभरापासून प्राथमिक शिक्षकांची विषय शिक्षक पदस्थापना प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील इयत्ता आठवीचे वर्ग तुटत आहेत, शिक्षक विनाकारण अतिरिक्त होत आहेत, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांचे समायोजन रखडले आहे. वर्षभरापासून ७७२ शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित आहेत, अवघड क्षेत्र निवडतांना अनेक तालुक्यात अन्याय झाला आहे, पंचायत समितीने सुचविलेली पात्र गावे घेण्यात आलेले नाहीत, जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी ३१ मे अंतिम तारीख असताना अद्याप काहीच हालचाल करण्यात आली नाही. यासह शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.याविरोधात कृती समितीने सर्वप्रथम ३० डिसेंबरला निवेदन दिले त्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने २४ एप्रिलला व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २८ एप्रिलला जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये प्रशासनाने सर्व समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता मे महिना उलटत चालला आहे. तरीही कोणतीही समस्या निकाली काढण्यात आलेली नाही. त्याकरिता जिल्ह्यातील १७ शिक्षक व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत समन्वय समितीची स्थापना केली व सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली.पहिल्या दिवशी कैलास म्हस्के, चंद्रकांत पांडे, दीपक वर्हेकर, गणपत विधाते, संजय लांडे, साईबाबा इंदूरवार, आदेश वंजारी, मोरेश्वर बोन्डे, कालिदास वाळके, सुनील ढोके, अनिल आवळे, दुष्यांत निमकर, सुनील दुधे आदी शिक्षकांनी उपोषण केले. याप्रमाणे २६ मेपर्यंत दररोज प्रत्येक संघटनेचे दोन प्रतिनिधी उपोषण करणार आहेत.साखळी उपोषणाचे नेतृत्व निमंत्रक विजय भोगेकर, सहनिमंत्रक मुकुंदा जोगी, कोषाध्यक्ष राजू लांजेकर, सहकोषाध्यक्ष अलका ठाकरे यांचेसह सदस्य ओमदास तुरानकर, उमाजी कोडापे, विलास बोबडे, संजय पडोळे, हरीश ससनकर, सुनील उईके, बंडू डाखरे, राजकुमार वेल्हेकर, नागेश सुखदेवे, रवींद्र उरकुडे, कविता गेडाम, नगाजी साळवे, गोसाई धोटे, राजू दर्वे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. साखळी उपोषणाला केंद्रप्रमुख संघटनेचे रामराव हरडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच पहिल्या दिवशी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी आंदोलन मंडपाला भेट दिली.