शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिभावाने न्हाऊन निघाला गजाननभक्तांचा अध्यात्मिक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

'जय गजानन' लिहिलेली टोपी घातलेली मंडळी प्रत्येकाजवळ जाऊन 'माऊली' अशी हाक देत सन्मानाने कार्यक्रमस्थळी नेत होते. कार्यक्रमस्थळी गजानन महाराजांची मूर्ती पाहून येणाऱ्या प्रत्येक भक्तांनाही परिसरात येताच माऊलीचा वास असल्याचा भास होत होता. अशा भक्तिमय वातावरणाने श्री संत गजानन महाराज यांचा अध्यात्मिक सोहळा न्हाऊन निघाला.

ठळक मुद्देश्री संत गजानन गौरव गाथा समितीचा सतत दुसरा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जय गजानन...गजानन महाराज की जय...गण गण गणात बोते...चा गजर. प्रत्येक भक्तांमध्ये माऊलीचा वास आहे ही भावना मनात साठवून डोक्यावर 'जय गजानन' लिहिलेली टोपी घातलेली मंडळी प्रत्येकाजवळ जाऊन 'माऊली' अशी हाक देत सन्मानाने कार्यक्रमस्थळी नेत होते. कार्यक्रमस्थळी गजानन महाराजांची मूर्ती पाहून येणाऱ्या प्रत्येक भक्तांनाही परिसरात येताच माऊलीचा वास असल्याचा भास होत होता. अशा भक्तिमय वातावरणाने श्री संत गजानन महाराज यांचा अध्यात्मिक सोहळा न्हाऊन निघाला.श्री संत गजानन गौरव गाथा समितीच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात रविवारी सायंकाळी हा अध्यात्मिक सोहळा पार पडला. माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व महापौर राखी कंचर्लावार, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे हे या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.या सोहळ्याचे प्रास्ताविक श्री संत गजानन गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी तर संचालन मंजुषा रवींद्र अडावतकर यांनी केले.गजनान भक्तांसाठीचा हा अध्यात्मिक सोहळा घडवून आणण्यासाठी श्री संत गजानन गौरव गाथा समिती सचिव पी. आर. देशमुख, उपाध्यक्ष संजय जगशेट्टीवार, राजेंद्र तुम्मेवार, प्रसिद्धी प्रमुख किशोर बोधे, संदीप देशपांडे, कोषाध्यक्ष अविनाश उत्तरवार, अतुल सकदेव, समीर तातावार, विवेक मामीडवार, विलास कोहळे, बंडू पोटे, दिगांबर इंगळे, महेश पिंपळशेंडे, किशोर गोगुलवार, डॉ. कुळकर्णी, क्रिष्णकांत पोद्दार, अभिजित मोहगावकर, पंकज देशमुख, प्रिया धिरज चौधरी, सुनंदा चिंतावार, वृंदा मामीडवार, छबुताई वैरागडे, भाटीया आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६.३० वाजताची होती. मात्र गजानन भक्तांनी ५ वाजतापासूनच हजेरी लावली होती. कार्यक्रम सुरू व्हायला वेळ असताना सभागृह गजानन भक्तांनी खचाखच भरले होते. याची चाहूल श्री संत गजानन गौरव गाथा समितीला अगोदरच लागली होती म्हणूनच की काय आयोजकांनी एकही गजानन भक्त गजानन महाराज यांच्या गौरव गाथा ऐकण्यापासून वंचित राहू नये, यासाठी सभागृहाच्या आवारात स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पाहता पाहता या आवारातील खुच्यार्ही गजानन भक्तांच्या उपस्थितीने कमी पडत होत्या. मात्र याची कमतरता आयोजकांनी जाणवू दिली नाही. कार्यक्रमानंतर महाराजांच्या आवडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. असे असताना आयोजन समिती सदस्य महाप्रसादाला उशीर लागेल असे सांगून प्रत्येकाजवळ चहा बिस्कीट घेऊन जात महाप्रसादाला उशीर लागेल असे म्हणत सेवा देत होते. अध्यात्मिक सोहळा कसा असावा याची प्रचिती याप्रसंगी आल्यावाचून राहिली नाही. या सोहळ्याचा समारोप महाजारांना प्रिय असलेल्या महाप्रसादाने करण्यात आला.एकदा तरी आम्हास भेट रे गजानना...अकोला येथील गजानन भक्त सुनील देशपांडे हे माऊलीचे विचार, अध्यात्म आणि महाराजांचे त्या काळातील निस्सिम भक्त व माऊलींचे परस्पर संबंध तसेच त्यांची कृपा करण्याची पद्धत व भक्तांसाठी दिलेले अध्यात्मिक ज्ञान यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, महाराजांवरील ‘नित्यनाम स्मरणे पावे गजानन...भक्त रक्षणास नित्य धावे गजानन...’, ‘पाणावले डोळे दाटे गहिवर...देव उघडते वैकुंठाचे दार...’ या भजनांनी गजानन भक्त न्हाऊन निघाले. अध्यात्मिक सोहळ्याचा शेवट ‘अंतरी फिरून ये उचंबळूनी प्रार्थना...एकदा तरी आम्हास भेट रे गजानना...’ या भजनाने झाला. यावेळी उपस्थित गजाजन भक्तांचे डोळे पाणावले होते. मूल येथील चंदू पाटील मारकवार यांनी माऊलीच्या विचारावर ग्रामविकास साधला, यावर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Socialसामाजिक