शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

खड्डे खोदण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:12 IST

३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनो, गतिशील व्हा : ३३ कोटी वृक्षलागवडीत जिल्हा राहणार अग्रणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून जो विभाग यात मागे आहे, त्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत खड्डे पूर्ण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले. यावेळी वृक्षलागवडीची प्रक्रिया व खड्ड्यांची सद्यस्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या संदर्भात बैठक झाली. वनविभागाने या संदर्भात एक प्रणाली विकसित केली असून यामध्ये प्रत्येक घटनेची नोंद केली जाणार आहे.आजच्या बैठकीमध्ये वनविभाग चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सामाजिक वनीकरण विभाग, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळाचे अधिकारी, वेगवेगळ्या प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे विभाग, अधीक्षक अभियंता व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होत. या बैठकीत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी आतापर्यंत किती खड्डे तयार केले, त्याबद्दल आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, विभागीय वन अधिकारी तथा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे मुख्य संयोजक अशोक सोनकुसरे, एस. खरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सहाय्यक अभियंता रवींद्र हजारे, इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.ग्रामपंचायतस्तरावर व्याप्ती वाढवाजिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषद व ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन वेळेत पूर्ण होईल, याबाबत सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतस्तरावर या उपक्रमाची व्याप्ती वाढली पाहिजे, मोठया प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिले.राज्यभरातील जाणून घेतली स्थितीया बैठकीच्या पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. ही चर्चा विविध मुद्यांवर व सखोल करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपणाच्या संदर्भात काय तयारी सुरु आहे, याबद्दलचा आढावा घेत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तेथील स्थिती जाणून घेतली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीforest departmentवनविभाग