शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

सार्वजनिक शौचालयाच्या भिंती झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 00:41 IST

आजचे युग जाहिरातीचे युग आहे. आपले विचार लोकांच्या मनात रुजविण्याकरिता जाहिरातीच्या अनेक माध्यमांचा वापर केला जातो.

भद्रावती नगर परिषदेचा उपक्रम लोकप्रबोधनासाठी भिंतीचा वापरयशवंत घुमे । लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती) : आजचे युग जाहिरातीचे युग आहे. आपले विचार लोकांच्या मनात रुजविण्याकरिता जाहिरातीच्या अनेक माध्यमांचा वापर केला जातो. कमीत कमी शब्दांचा आधार घेवून जास्तीत जास्त व मोठा आशय वाचकांच्या गळी उतरवण्याचे कार्य जाहिराती करीत असतात. परंतु भद्रावती पालिकेने शहरातील नागरिकांत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी वापरलेली क्लुप्ती प्रभावी ठरली आहे. सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर पालिकेने लिहिलेला सचित्र घोषणा परिसरात उद्बोधनपर ठरत आहे.जनमानसात जागृती घडविण्यासाठी प्रशासन नेहमीच क्रियाशिल असते. त्यासाठी प्रशासनाकडून प्रसिद्धी माध्यमांचा वापर प्रभाविपणे केला जातो. पूर्वी वर्तमानपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी, भिंतीपत्रके, उद्घोषणा यांचा वापर व्हायचा. आता अलिकडच्या काळात वरील साधनाव्यतिरिक्त फेसबुक, व्हॉटस्अप यासारख्या सोशल मिडीयाचाही प्रभावीपणे वापर करून जनजागृती केली जात आहे. परंतु भद्रावती पालिकेने याही पुढे जावून शहरात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरिता सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर आशयपूर्ण चित्र काढून जनजागृतीपर स्लोगन लिहिले आहेत. शौचालयाचा वापर करणाऱ्यांना व त्या रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष शौचालयाच्या भिंती वेधून घेत आहेत. ‘सौ बकी आणि एक लिखी’ म्हणतात. त्याप्रमाणे शौचालयाच्या भिंतीवरील रंगीबेरंगी जाहिराती प्रभावीपणे जनजागृतीचे काम करीत आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हे जनजागृतीचे माध्यम प्रभावी ठरत असून जसे स्वच्छ भारत सुंदर भारत, शौचालयाचा नियमीत वापर करा, एक कदम स्वच्छता की और, हागणदारी मुक्त भद्रावती शहर, अशी विविध उद्बोधनात्मक वाक्ये नागरिकांचे प्रभावी प्रबोधन करीत आहेत. उघड्यावर शौचास बसू नये, ते कायद्याने गुन्हा आहे. नियमित शौचालयाचा वापर करा, असा संदेश यातून देण्यात आला आहे. शहरातील शाही चौक, भंगाराम वॉर्ड, बुरड मोहल्ला, विंजासन खापरी बेघर वार्ड, हिवरकर सोसायटी, डोलारा तलाव, भूमी अभिलेख कार्यालयाजवळ सार्वजनिक शौचालयावरील भिंतीचा वापर पालिकेने जनजागृतीसाठी अतिशय प्रभावीपणे केला आहे. या भिंती जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या मनावर स्वच्छतेचे महत्त्व बिंबवीत असून या शौचालयाच्या मुक्या भिंतीही सजीव बोलक्या झाल्याचे प्रचिती येत आहे.