शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

भाव पडल्याने सोयाबीन उत्पादन अडचणीत

By admin | Updated: October 25, 2014 22:37 IST

सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या

लखमापूर : सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वाढ खुंटली. यातच दरवर्षी दिवाळी सणाआधी कापूस व सोयाबिन पिकाने घर भरुन दिसायची मात्र यावर्षी शेतकऱ्यांची घरे रिकामी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही सिंचनाखालील जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन निघाले आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनक्षमता कमालिची घसरली आहे. बाजारात संध्या कापसाला ३७०० रुपये तर सोयाबिनला २२०० ते २८०० रुपये भाव आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कवडीमोल भावात मालाची विक्री करावी लागत आहे.गेल्या दोन वर्षापासून कधी पावसाने तर कधी पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि यावर्षी पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यात ओलिताची सुविधा असणारे शेतकरी पाणीपुरवठा करीत आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. दरवर्षी शेतीपयोगी खताच्या बियाण्यांच्या आणि किटकनाशकाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसते. त्यामुळे एकरी उत्पादन खर्च १५ ते २० हजारांपर्यंत जात आहे. शेतात काम करणाऱ्या गडीमाणसाचे वार्षिक संकट ७० ते ८० हजार तर कुठे एक लाखापर्यंत आहे. मजुरांच्या मजुरीतही कमालीची वाढ झाली आहे. या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाची भाववाढ ठप्प आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन केव्हा येणार असाही सूर आता शेतकऱ्यांमध्ये आळवला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन हंगामाची सुरुवात केली. दुबार -तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. आता पीक घरात नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाऊसच नसल्याने व जमिनीतील पावसाची पातळी कमी होत असल्याने ओलीत करणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाण्याअभावी झाडांना फळधारणा अत्यल्प दिसत आहे. याचा परिणाम निश्चितच उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात काही मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. यात कोरपना तालुक्यातील कापूस खरेदी डबघाईला आली आहे. त्यामुळे यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना कापसाची खरेदी विक्री करावी लागणार आहे. उत्पादन कमी असल्याने वाहन खर्च करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरणार असल्याचे दिसते. दिवाळी अंधारात जात असतानाच शेतकऱ्यांचे दिवाळेही निघण्याची वेळ आली आहे. शासन शेतकऱ्यांसाठी योजनांचा काय पाऊस पाडते हे येणारा काळच ठरवेल. (वार्ताहर)