शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

भाव पडल्याने सोयाबीन उत्पादन अडचणीत

By admin | Updated: October 25, 2014 22:37 IST

सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या

लखमापूर : सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वाढ खुंटली. यातच दरवर्षी दिवाळी सणाआधी कापूस व सोयाबिन पिकाने घर भरुन दिसायची मात्र यावर्षी शेतकऱ्यांची घरे रिकामी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही सिंचनाखालील जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन निघाले आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनक्षमता कमालिची घसरली आहे. बाजारात संध्या कापसाला ३७०० रुपये तर सोयाबिनला २२०० ते २८०० रुपये भाव आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कवडीमोल भावात मालाची विक्री करावी लागत आहे.गेल्या दोन वर्षापासून कधी पावसाने तर कधी पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि यावर्षी पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यात ओलिताची सुविधा असणारे शेतकरी पाणीपुरवठा करीत आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. दरवर्षी शेतीपयोगी खताच्या बियाण्यांच्या आणि किटकनाशकाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसते. त्यामुळे एकरी उत्पादन खर्च १५ ते २० हजारांपर्यंत जात आहे. शेतात काम करणाऱ्या गडीमाणसाचे वार्षिक संकट ७० ते ८० हजार तर कुठे एक लाखापर्यंत आहे. मजुरांच्या मजुरीतही कमालीची वाढ झाली आहे. या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाची भाववाढ ठप्प आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन केव्हा येणार असाही सूर आता शेतकऱ्यांमध्ये आळवला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन हंगामाची सुरुवात केली. दुबार -तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. आता पीक घरात नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाऊसच नसल्याने व जमिनीतील पावसाची पातळी कमी होत असल्याने ओलीत करणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाण्याअभावी झाडांना फळधारणा अत्यल्प दिसत आहे. याचा परिणाम निश्चितच उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात काही मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. यात कोरपना तालुक्यातील कापूस खरेदी डबघाईला आली आहे. त्यामुळे यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना कापसाची खरेदी विक्री करावी लागणार आहे. उत्पादन कमी असल्याने वाहन खर्च करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरणार असल्याचे दिसते. दिवाळी अंधारात जात असतानाच शेतकऱ्यांचे दिवाळेही निघण्याची वेळ आली आहे. शासन शेतकऱ्यांसाठी योजनांचा काय पाऊस पाडते हे येणारा काळच ठरवेल. (वार्ताहर)